शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

ग्रामसभांमध्ये देणार ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश!

By admin | Updated: January 25, 2016 02:04 IST

जिल्हा परिषदांनी पाठविली सरपंचांना पत्र

संतोष येलकर/अकोला: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या ग्रामसभांमध्ये ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना लिहिलेले संदेश पत्र जिल्हा परिषदेमार्फत सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्थेचे प्रमुख व प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायातींच्या सरपंचांना लिहिलेल्या पत्राचे ग्रामसभांमध्ये वाचन करण्यात येणार आहे. या पत्रात ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेला संदेश ग्रामसभांमध्ये वाचून दाखविला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनामार्फत ग्रामपंचायतींना मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार्‍या निधीचा विनियोग व संनियंत्रण प्रभावी व परिणामकारक होणे आवश्यक असून, ग्रामस्थांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार या निधीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांच्यामार्फत २२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असून हे पत्र अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांमार्फत संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकार्‍यांकडून ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. पाण्याचा ताळेबंद आराखड्यात सहभाग महत्त्वाचा!टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून, पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन गाव आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ हेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही कर प्रणाली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा सल्लादेखील ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे.

'आमचा गाव आमचा विकास'साठी निधीचा वापर करा!'आमचा गाव आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने गावाच्या सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांचा सहभाग घेऊन योजनांचा निधी, स्वनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात केले आहे.