शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

ग्रामसभांमध्ये देणार ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश!

By admin | Updated: January 25, 2016 02:04 IST

जिल्हा परिषदांनी पाठविली सरपंचांना पत्र

संतोष येलकर/अकोला: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या ग्रामसभांमध्ये ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना लिहिलेले संदेश पत्र जिल्हा परिषदेमार्फत सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्थेचे प्रमुख व प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायातींच्या सरपंचांना लिहिलेल्या पत्राचे ग्रामसभांमध्ये वाचन करण्यात येणार आहे. या पत्रात ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेला संदेश ग्रामसभांमध्ये वाचून दाखविला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनामार्फत ग्रामपंचायतींना मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार्‍या निधीचा विनियोग व संनियंत्रण प्रभावी व परिणामकारक होणे आवश्यक असून, ग्रामस्थांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार या निधीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांच्यामार्फत २२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असून हे पत्र अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांमार्फत संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकार्‍यांकडून ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. पाण्याचा ताळेबंद आराखड्यात सहभाग महत्त्वाचा!टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून, पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन गाव आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ हेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही कर प्रणाली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा सल्लादेखील ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे.

'आमचा गाव आमचा विकास'साठी निधीचा वापर करा!'आमचा गाव आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने गावाच्या सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांचा सहभाग घेऊन योजनांचा निधी, स्वनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात केले आहे.