शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी ५० वर ग्रामपंचायतींचे ठराव

By admin | Updated: February 1, 2015 00:54 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी

जागरण जनमंचचा पुढाकार : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिग्रस (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव घेतला. जागरण जनमंचच्या पुढाकारात विविध संघटनांच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी लोकमत मीडिया प्रा.लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सुरूवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या रेल्वे मार्गाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात अत्यल्प निधी मिळाला.खा. विजय दर्डा निधीसाठी नेहमी आग्रही असतात. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आता दिग्रस तालुक्यातील जनताही त्यांच्या सोबतीला आली आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींनी ठराव करून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात मोठी तरतूद या प्रकल्पासाठी करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी जागरण जनमंचने पुढाकार घेतला असून, सर्वपक्षीय नेत्यांसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने एक निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना तहसीलदार नितीन देवरे यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.या निवेदनावर सुधीर देशमुख, सुभाष अटल, सुरेंद्र मिश्रा, नवीन गड्डा, प्रा. विठ्ठल काटेवाले, महादेव सुपारे, दीपक वानखेडे, राज चव्हाण, रवींद्र अरगडे, अरविंद मिश्रा, संजीव चोपडे, मंगेश दुद्दलवार, नीरज दुद्दलवार, रामदास पद्मावार, अतीश शिंदे, रमाकांत काळे, रामभाऊ मारशेटवार, केतन रत्नपारखी, पवन गावंडे, अभय इंगळे, मजहर खान, कमलेश आडे, लालसिंग राठोड, उद्धव अंभुरे, प्रफुल्ल व्यवहारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या ग्रामपंचायतींनी केला ठरावप्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत तालुक्यातील साखरा, सावंगा खुर्द, तिवरी, खंडापूर, चिंचोली क्र. १, निंभा, सेवानगर, इसापूर, रामनगर, राहटी, झिरपूरवाडी, शिवणी, फेट्री, रुई तलाव, महागाव, साखरी, काटी, मरसूळ, रुई मोठी, लाख रायाजी, हरसूल, बेलोरा, आरंभी, वसंतनगर, कांदळी, डेहणी, धानोरा खु., माळहिवरा, डोळंबा, आमला बु., चिरकुटा, विठोली, वाई मेंढी, लिंगीवाई, वाई, खेकडी, मोख, चिचपातर, मांडवा, कळसा, धानोरा बु., सावंगा बु., देऊरवाडा, विठाळा, तुपटाकळी येथील ग्रामपंचायतींनी रेल्वेमार्ग तत्काळ पूर्ण करण्यासाठी ठराव घेतला आहे.