शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी ५० वर ग्रामपंचायतींचे ठराव

By admin | Updated: February 1, 2015 00:54 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी

जागरण जनमंचचा पुढाकार : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिग्रस (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव घेतला. जागरण जनमंचच्या पुढाकारात विविध संघटनांच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी लोकमत मीडिया प्रा.लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सुरूवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या रेल्वे मार्गाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात अत्यल्प निधी मिळाला.खा. विजय दर्डा निधीसाठी नेहमी आग्रही असतात. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आता दिग्रस तालुक्यातील जनताही त्यांच्या सोबतीला आली आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींनी ठराव करून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात मोठी तरतूद या प्रकल्पासाठी करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी जागरण जनमंचने पुढाकार घेतला असून, सर्वपक्षीय नेत्यांसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने एक निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना तहसीलदार नितीन देवरे यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.या निवेदनावर सुधीर देशमुख, सुभाष अटल, सुरेंद्र मिश्रा, नवीन गड्डा, प्रा. विठ्ठल काटेवाले, महादेव सुपारे, दीपक वानखेडे, राज चव्हाण, रवींद्र अरगडे, अरविंद मिश्रा, संजीव चोपडे, मंगेश दुद्दलवार, नीरज दुद्दलवार, रामदास पद्मावार, अतीश शिंदे, रमाकांत काळे, रामभाऊ मारशेटवार, केतन रत्नपारखी, पवन गावंडे, अभय इंगळे, मजहर खान, कमलेश आडे, लालसिंग राठोड, उद्धव अंभुरे, प्रफुल्ल व्यवहारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या ग्रामपंचायतींनी केला ठरावप्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत तालुक्यातील साखरा, सावंगा खुर्द, तिवरी, खंडापूर, चिंचोली क्र. १, निंभा, सेवानगर, इसापूर, रामनगर, राहटी, झिरपूरवाडी, शिवणी, फेट्री, रुई तलाव, महागाव, साखरी, काटी, मरसूळ, रुई मोठी, लाख रायाजी, हरसूल, बेलोरा, आरंभी, वसंतनगर, कांदळी, डेहणी, धानोरा खु., माळहिवरा, डोळंबा, आमला बु., चिरकुटा, विठोली, वाई मेंढी, लिंगीवाई, वाई, खेकडी, मोख, चिचपातर, मांडवा, कळसा, धानोरा बु., सावंगा बु., देऊरवाडा, विठाळा, तुपटाकळी येथील ग्रामपंचायतींनी रेल्वेमार्ग तत्काळ पूर्ण करण्यासाठी ठराव घेतला आहे.