शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

ग्रामपंचायती, पालिकांना मिळणार २७,४४७ कोटी

By admin | Updated: March 5, 2015 22:51 IST

चौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या निवाड्यानुसार आगामी पाच वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगर पंचायती व महापालिकांना केंद्र सरकारकडून २७,४४७ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

वित्त आयोगाचा निवाडा : मूलभूत सेवा पुरविण्यावर भर; वर्षाला दरडोई ४८८ रुपये मिळणार अनुदानअजित गोगटे - मुंबईचौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या निवाड्यानुसार आगामी पाच वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगर पंचायती व महापालिकांना केंद्र सरकारकडून २७,४४७ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापैकी १५,०३५ कोटी रुपये ग्रामपंचायतींसाठी तर १२,४१२ कोटी रुपये नगरपालिका व महापालिकांसाठी असतील. वर्षाला दरडोई सरकारी ४८८ रुपये या दराने हे अनुदान मिळणार आहे.ग्रामपंचायतींना मिळणारी ९० टक्के रक्कम मूळ अनुदान असेल व ते कोणत्याही अटीविना दिले जाईल. बाकीची १० टक्के रक्कम कामगिरीवर आधारित अनुदान (परफॉर्मन्स ग्रॅन्ट) असेल व ठराविक निकषांची पूर्तता केली तरच ती मिळू शकेल. नगरपालिका व महापालिकांच्या बाबतीत मूळ अनुदान व‘परफॉरर्मन्स ग्रॅन्ट’चे गुणोत्तर ८०:२० असे असेल.पंचायत राजव्यवस्थेतील तालुका पंचायत व जिल्हा परिषद या मधल्या स्तरावरील संस्थांसाठी आयोगाने कोणत्याही अनुदानाची शिफारस केलेली नाही. त्यांना लागणाऱ्या निधीची तजवीज राज्य सरकारला स्वत:च्या तिजोरीतून करावी लागेल.अनुदानाची ही रक्कम केंद्र सरकारने दरवर्षी राज्य सरकारला द्यायची आहे व राज्य सरकारने त्याचे ग्रामपंचायती, नगर परिषदा व महापालिकांना वाटप करायचे आहे. हे वाटप राज्य वित्त आयोगाने त्यांच्या ताज्या अहवालात ठरवून दिलेल्या सूत्रानुसार केले जाईल. राज्य आयोगाने ठरविलेले असे सूत्र उपलब्ध नसेल, तर सन २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्राचे क्षेत्रफळ यांच्या ९०:१० या गुणोत्तरानुसार अनुदानाचे वाटप केले जाईल.ग्रामपंचायतींनी अनुदानापोटी मिळणारी रक्कम पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, स्थानिक रस्ते, शालेय इमारती, घन कचरा व्यवस्थापन व मलनि:सारण, रस्त्यांवरील दिवे आणि पदपथ व बगिचे/उद्याने या मूलभूत सेवा पुरविण्यासाठीच खर्च करण्याचे बंधन असेल. ग्रामपंचायतींची लेखापुस्तके योग्य पद्धतीने लिहिली जात नाहीत व त्यांचे लेखापरीक्षणही वेळच्या वेळी होत नाही. परिणामी, त्यांच्या नेमक्या वित्तीय स्थितीचे चित्र स्पष्ट होत नाही. शिवाय त्या सार्वजनिक पैसा खर्च करीत असल्या तरी त्याच्याशी निगडित असलेली वित्तीय शिस्तीची जबाबदारी त्यांच्यावर टाकता येत नाही. हे लक्षात घेऊन आयोगाने एकूण अनुदानापैकी १० टक्के रक्कम ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ म्हणून देण्याचे ठरविले आहे. जेणेकरून लेखापरीक्षित लेखापुस्तकांतून ग्रामपंचायतींच्या वास्तव वित्तीय स्थितीची आकडेवारी पुढे यावी आणि त्यांना स्वत:चा महसूल वाढविण्यास प्रोत्साहन मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे. ज्या वर्षासाठीची ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ देय असेल त्याच्या आधीच्या दोन वर्षांची लेखापरीक्षित लेखापुस्तके तयार असतील तरच ग्रामपंचायत हे अनुदान मिळण्यास पात्र ठरेल.नगरपालिका व महापालिकांसाठी ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’चे तीन प्रमुख निकष असतील. एक, अनुदान वर्षाच्या किमान दोन वर्षाआधीची लेखापरीक्षित लेखापुस्तके तयार असणे. दोन, आधीच्या वर्षाच्या तुलनेत स्वत:च्या उत्पन्नात वाढ होणे (जकात व प्रवेशकर वगळून) आणि तीन, सेवा दर्जा निकष जाहीर करून त्यांची पूर्तता झाली की नाही हेही जाहीर करणे.आयोगाने हे अनुदान वर्ष २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांसाठी निश्चित केले आहे. मात्र, ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’चे वाटप एक वर्ष उशिराने म्हणजे २०१६-१७ पासून सुरू होईल. तत्पूर्वी, राज्य सरकारने या महिनाअखेरपर्यंत ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’च्या वाटपाचे निकष व पद्धती ठरवायची आहे. एखाद्या वर्षी ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ची काही रक्कम शिल्लक राहिली तर तिचे सर्व पात्र ग्रामपंचायती व पालिका/ महापालिकांमध्ये समन्यायी वाटप करावे, असे आयोगाने सांगितले आहे.केंद्र सरकारने दरवर्षीचे अनुदान राज्याला दोन हप्त्यांत द्यायचे आहे. ५० टक्के अनुदानाचा पहिला हप्ता जूनमध्ये व राहिलेले ५० टक्के अनुदान आणि ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ आॅक्टोबरमध्ये. केंद्राकडून अनुदान मिळाल्यानंतर राज्य सरकारने ते १५ दिवसांत ग्रामपंचायती, नगरपालिका व महापालिकांना द्यायचे आहे; अन्यथा राज्य सरकारला त्यावर व्याज द्यावे लागेल.२असे मिळेल अनुदानवर्षग्रामपंचायतीपालिका/ महापालिका२०१५-१६१,६३२.३२ कोटी १,१९१.२४ कोटी२०१६-१७२,२४७.७७ कोटी१,६४९.४९ कोटी२०१७-१८२,५९७.१० कोटी१,९०५.८३ कोटी२०१८-१९३,००४.३७ कोटी२,२०४.७० कोटी२०१९-२०४,०४९.५५ कोटी२,९७९.०२ कोटीराज्यातील अनुदानपात्र संस्थाग्रामपंचायती२७,८७३नगरपालिका२२०नगर पंचायती१२कटकमंडळे०७महापालिका२६