शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च उधारीवर !

By admin | Updated: July 20, 2015 01:02 IST

येत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने,

संतोष येलकर , अकोलायेत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, तहसीलदारांकडून या निवडणुकांचा खर्च उधारीवर भागविला जात आहे.कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागात २३ जिल्ह्यांतील ७ हजार १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि १ हजार २१२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रति मतदान केंद्र १० हजार रुपये किंवा प्रति ग्रामपंचायत ४० हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली, परंतु हा खर्च भागविण्यासाठी आतापर्यंत प्रति ग्रामपंचायत १५ हजार रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे. मागणीच्या तुलनेत निधी कमी उपलब्ध असल्याने मंडप, वाहनांसाठी डिझेल, प्रिटिंग, स्टेशनरी, पाणी, अल्पोपहार, कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी खर्च संबंधित तहसीलदारांकडून उधारीवर भागविण्यात येत आहे.