शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ग्रामपंचायती संगणकाने जोडणार

By admin | Updated: January 3, 2017 04:54 IST

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही

पनवेल : महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी खारघर येथे केले. खारघर सेक्टर २१ मध्ये सिडकोने बांधलेल्या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. राज्याच्या विकासात ग्रामीण भागाचा सहभाग महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांचे अनुकरण इतर राज्ये करीत आहेत. ग्रामीण भागात रस्ते झाल्यास गावात उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा पोहोचतील. दोन वर्षांत १७ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे १५ हजार विद्यार्थी खासगी शाळेतून जिल्हा परिषदेकडे वळले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. प्रत्येक जिल्ह्यात बचत गट, मॉल सुरू झाले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा मंत्र प्रत्यक्षात उतरायला ७ दशके लागली. ३०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना ग्रामविद्युत सेवक दिले आहेत, तसेच खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्मार्ट ग्रामयोजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी ग्रामविकास भवनसह विविध योजनांची माहिती दिली. या वेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)