शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायती संगणकाने जोडणार

By admin | Updated: January 3, 2017 04:54 IST

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही

पनवेल : महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी खारघर येथे केले. खारघर सेक्टर २१ मध्ये सिडकोने बांधलेल्या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. राज्याच्या विकासात ग्रामीण भागाचा सहभाग महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांचे अनुकरण इतर राज्ये करीत आहेत. ग्रामीण भागात रस्ते झाल्यास गावात उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा पोहोचतील. दोन वर्षांत १७ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे १५ हजार विद्यार्थी खासगी शाळेतून जिल्हा परिषदेकडे वळले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. प्रत्येक जिल्ह्यात बचत गट, मॉल सुरू झाले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा मंत्र प्रत्यक्षात उतरायला ७ दशके लागली. ३०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना ग्रामविद्युत सेवक दिले आहेत, तसेच खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्मार्ट ग्रामयोजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी ग्रामविकास भवनसह विविध योजनांची माहिती दिली. या वेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)