शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप

By admin | Updated: October 8, 2015 02:09 IST

दुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईदुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे. बुधवारी ठाणे महापालिकेतील नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने धान्याचे वाटप करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा येथून आलेल्या दुष्काळग्रस्तांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा अवस्थेत त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने या स्थलांतरित कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. मढवी या दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करण्यासाठी मागील महिनाभर प्रयत्नशील होत्या. अखेर महेंद्र मढवी, प्रतीक पवार, अमोल काळे, सुजित पवार, अमित पाटील या कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्नांतून २00 किलो तांदूळ व ४0 किलो गहू खरेदी करून आज त्याचे वाटप केले. आघाडी सरकारने केली होती मदत -२०१२ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडल्यानंतर हजारो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत आले होते. तत्कालीन काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्पुरत्या शिधापत्रिका देऊन स्वस्त दरात धान्य मिळवून दिले होते. -तत्कालीन अन्न व पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली स्वत:च्या हाताने धान्य वितरणाची सुरवात केली होती. जवळपास तीन महिने दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करून दिले होते.मिळालेल्या धान्यातून आठवडाभराचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला खरा, पण त्यानंतर आम्ही पोट भरायचे तरी कसे यावर कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. स्वत:चे शेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळते. पण दुसऱ्याच्या शेतावर काम करून पोट भरणाऱ्यांनी संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा, असा सवाल वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या महादेव हटकर यांनी व्यक्त केली.