शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप

By admin | Updated: October 8, 2015 02:09 IST

दुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईदुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे. बुधवारी ठाणे महापालिकेतील नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने धान्याचे वाटप करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा येथून आलेल्या दुष्काळग्रस्तांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा अवस्थेत त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने या स्थलांतरित कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. मढवी या दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करण्यासाठी मागील महिनाभर प्रयत्नशील होत्या. अखेर महेंद्र मढवी, प्रतीक पवार, अमोल काळे, सुजित पवार, अमित पाटील या कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्नांतून २00 किलो तांदूळ व ४0 किलो गहू खरेदी करून आज त्याचे वाटप केले. आघाडी सरकारने केली होती मदत -२०१२ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडल्यानंतर हजारो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत आले होते. तत्कालीन काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्पुरत्या शिधापत्रिका देऊन स्वस्त दरात धान्य मिळवून दिले होते. -तत्कालीन अन्न व पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली स्वत:च्या हाताने धान्य वितरणाची सुरवात केली होती. जवळपास तीन महिने दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करून दिले होते.मिळालेल्या धान्यातून आठवडाभराचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला खरा, पण त्यानंतर आम्ही पोट भरायचे तरी कसे यावर कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. स्वत:चे शेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळते. पण दुसऱ्याच्या शेतावर काम करून पोट भरणाऱ्यांनी संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा, असा सवाल वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या महादेव हटकर यांनी व्यक्त केली.