शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी पात्रता निश्चितीसाठी जीआर

By admin | Updated: June 29, 2017 01:49 IST

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकरिता रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकरिता रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत. पात्रता निश्चितीच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय (जीआर) बुधवारी गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पात्रता ठरविताना ज्यांच्याकडे स्वतंत्र गाळ्यासाठी स्वतंत्र भाडेपावती किंवा भाडेदारी करारपत्र असल्यास त्यांना स्वतंत्र गाळे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, एकापेक्षा जास्त सलग खोल्या असूनही एकच भाडेपावती असल्यास स्वतंत्र गाळे मानले जाणार नाही. शिवाय, बीडीडी चाळीतील सरकारी वसाहतीतील सदनिका संबंधित शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याने सध्या राहत असणा-या कर्मचाऱ्यांचा कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार नाही.पुनर्विकासातील पात्रतेसाठी १३ जून १९९६ पुर्वी बीडीडी चाळ संचालक, व्यवस्थापक यांनी दिलेली भाडेपावती, भाडेदारी करारनामा (नियमितीकरण अथवा हस्तांतरण आदेश), या तारखेपुर्वीचे तत्कालीन गाळेधारकाच्या नाव असलेले वीज बील, टेलिफोन बिल, मतदार यादीचा प्रमाणित उतारा, व्यावसायिक वापरातील गाळ्याबाबत गुमास्ता परवाना किंवा अन्य परवाना आदीपैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. शिवाय, सध्या राहत असणाऱ्यांना भाडेकरु असल्याचे सिद्ध करण्यासाठी १ जानेवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीतील वीज बिल, टेलिफोन बिल, भाडेपावती, महापालिका पावती अथवा परवाना यातील एका पुराव्याची आवश्यकता असणार आहे. मूळ भाडेकरुचे निधन झाले असल्यास १९८६ च्या तरतुदीनुसार संबंधित भाडेकरुंच्या वारसांकडे कायदेशीर हक्क हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. निवासी आणि अनिवासी गाळे कायदेशीर वारसाच्या नावावर करण्याकरिता उत्तराधिकार प्रमाणपत्रे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संचालकांना प्रलंबित प्रकरणांमध्ये तातडीने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.