शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ग्रेस मार्कांमुळेच वाढला दहावीचा टक्का

By admin | Updated: August 3, 2015 01:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तब्बल २ लाख ८६ हजार २४० विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणाचा

राहुल शिंदे, पुणेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तब्बल २ लाख ८६ हजार २४० विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणाचा आधार घेतला आहे. मंडळाने लेखी परीक्षेसाठी एकच एक ग्रेस गुण देण्याची पद्धत ठेवल्यामुळे राज्याचा दहावीचा निकाल फुगत असल्याचे दिसत आहे.मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.४६ टक्के लागला, तर नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ८७.७३ टक्के लागला. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यातच ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने निकाल जाहीर होत असल्याने ४८ हजार ५८३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर ८५ ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७८ हजार ६२७ होती.मात्र, ८०/२० ‘पॅटर्न’मुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २० गुणांच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षांसाठी पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे सहा विषयांच्या ४८० गुणांच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ १०० ते ९० गुणांपेक्षा कमी गुणांची गरज असते. तरीही २ लाख ८६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस गुणाच्या आधाराची गरज भासली, असे राज्य मंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २ लाख ११ हजार ६३६ विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत.