शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दहावी निकालाच्या जीआरने अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट, शिक्षण विभागाचा ‘अभ्यास’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:43 IST

SSC Exams: शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यवतमाळ : दहावीची परीक्षा यंदा कोरोनामुळे टळली. मात्र, या परीक्षेने खुद्द अधिकाऱ्यांचीच परीक्षा पाहिली. शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या ११ पानी जीआरचा अभ्यास करता करता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.दहावीसारखे महत्त्वाचे वर्ष असूनही विद्यार्थ्यांंना शाळेत बसून अभ्यास करता आला नाही तरीही त्यांचा निकाल लावण्याची कठीण जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयात गुणदान करण्याच्या किचकट पद्धती सांगितल्या. वर्षभर शाळाच भरलेली नसताना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण कसे द्यावे, हा प्रश्न शिक्षक-मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांपुढेही निर्माण झाला आहे. मध्यंतरी केवळ महिना-दीड महिना दहावीचे वर्ग भरले. मात्र, त्यात केवळ २५ टक्के हजेरी होती. तेवढ्या आधारावर सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे शक्य होईल, हा प्रश्न आहे. आता नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० गुण, वर्षभरातील लेखी मूल्यमापनाच्या आधारे ३० गुण, दहावीतील तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे २० गुण अशा शंभर गुणांचे मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावला जाणार आहे. मात्र, हे मूल्यमापन नेमके कसे करावे हा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी ११ पानी जीआर जाहीर होताच शिक्षकांची व अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली. हा जीआर क्षणार्धात प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये पोहोचला. मात्र, त्यातील किचकट बाबी पाहून शिक्षकच विद्यार्थ्यांसारखे जीआरचा ‘अभ्यास’ करताना आढळले. राज्य शासनाने दहावीच्या बाबतीत आधीच गोंधळ केला होता. त्यात शुक्रवारच्या निर्णयाने आणखी भर पडली, अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक भारती’चे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी नोंदविली. 

निकाल तयार करताना अशा आहेत अडचणी शासन म्हणते....     - नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या निकालात ५० गुण द्यावे    - वर्षभरात झालेल्या अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ३० गुण द्यावे - दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला २० गुण देणार 

अडचण...- गेल्यावर्षी नववीची वार्षिक परीक्षाच झाली नाही.- यंदा दहावीचे वर्ग न झाल्याने अंतर्गत लेखी मूल्यमापन झालेलेच नाही तर गुण कसे द्यावे?- यंदा दहावीची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा झालीच नाही.