शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दहावी निकालाच्या जीआरने अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट, शिक्षण विभागाचा ‘अभ्यास’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:43 IST

SSC Exams: शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यवतमाळ : दहावीची परीक्षा यंदा कोरोनामुळे टळली. मात्र, या परीक्षेने खुद्द अधिकाऱ्यांचीच परीक्षा पाहिली. शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या ११ पानी जीआरचा अभ्यास करता करता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.दहावीसारखे महत्त्वाचे वर्ष असूनही विद्यार्थ्यांंना शाळेत बसून अभ्यास करता आला नाही तरीही त्यांचा निकाल लावण्याची कठीण जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयात गुणदान करण्याच्या किचकट पद्धती सांगितल्या. वर्षभर शाळाच भरलेली नसताना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण कसे द्यावे, हा प्रश्न शिक्षक-मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांपुढेही निर्माण झाला आहे. मध्यंतरी केवळ महिना-दीड महिना दहावीचे वर्ग भरले. मात्र, त्यात केवळ २५ टक्के हजेरी होती. तेवढ्या आधारावर सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे शक्य होईल, हा प्रश्न आहे. आता नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० गुण, वर्षभरातील लेखी मूल्यमापनाच्या आधारे ३० गुण, दहावीतील तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे २० गुण अशा शंभर गुणांचे मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावला जाणार आहे. मात्र, हे मूल्यमापन नेमके कसे करावे हा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी ११ पानी जीआर जाहीर होताच शिक्षकांची व अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली. हा जीआर क्षणार्धात प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये पोहोचला. मात्र, त्यातील किचकट बाबी पाहून शिक्षकच विद्यार्थ्यांसारखे जीआरचा ‘अभ्यास’ करताना आढळले. राज्य शासनाने दहावीच्या बाबतीत आधीच गोंधळ केला होता. त्यात शुक्रवारच्या निर्णयाने आणखी भर पडली, अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक भारती’चे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी नोंदविली. 

निकाल तयार करताना अशा आहेत अडचणी शासन म्हणते....     - नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या निकालात ५० गुण द्यावे    - वर्षभरात झालेल्या अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ३० गुण द्यावे - दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला २० गुण देणार 

अडचण...- गेल्यावर्षी नववीची वार्षिक परीक्षाच झाली नाही.- यंदा दहावीचे वर्ग न झाल्याने अंतर्गत लेखी मूल्यमापन झालेलेच नाही तर गुण कसे द्यावे?- यंदा दहावीची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा झालीच नाही.