शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

जीपीएस शोधणार पाणी

By admin | Updated: March 7, 2015 01:06 IST

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपला पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे़

नारायण जाधव - ठाणेराज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपला पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे़ यानुसार राज्यभरात पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्रोत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसद्वारे शोधले जाणार आहेत. त्यांचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर त्याचे मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ यातून पाण्याचे स्रोत विकसित होऊन त्याचा लाभ टंचाईग्रस्त भागांना होणार आहे.राजधानी मुंबईचे दोन जिल्हे वगळता ठाणे, पालघर, रायगडसह राज्यातील ३४ जिल्ह्यांत ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येईल. यावर ४९ लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे २४ लाख ९० हजार रुपये पाणीपुरवठा विभागाने बुधवारी वितरित केले. राज्यभरातील पाण्याच्या स्रोतांचा जीपीएसद्वारे शोध घेणे, पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करणे, ते स्वच्छ करणे, जीआयएसद्वारे त्यांचा वेब बेस तयार करून मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करणे ही कामे नागपूरच्या ‘महाराष्ट्र रिमोट सेंसिग अ‍ॅप्लिकेशन सेंटर’ला देण्यात आली आहेत. संचालक, पाणी स्वच्छता व साहाय्य संस्था, बेलापूर, नवी मुंबई यांनी एक सामंजस्य करारदेखील केला आहे़ ३४ जिल्ह्यांत ही कामे करून घेण्याची जबाबदारी संचालक, पाणी व स्वच्छता साहाय्य संस्थेवर सोपविण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्यांनी ती करायची आहे़ आऊट सोर्सिंगची मुभाही त्यांना देण्यात आली आहे़