शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

४० वर्षांपासून ग्रा.पं. विभाजन नाही

By admin | Updated: May 14, 2017 02:22 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायती ४० वर्षापासून विभाजनाच्या प्रतिक्षेत

शशिकांत ठाकूर। लोकमत न्यूज नेटवर्ककासा: डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायती ४० वर्षापासून विभाजनाच्या प्रतिक्षेत असून तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असल्याने गावपाडयांचा विकासच होत नाही. विकासकामांवर मर्यादा येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी आदिवासी भागातील बहूतेक ग्रामपंचायती या गृप ग्रामपंचायती आहेत. कासा ग्रामपंचायतीमध्ये कासा, भिसेनगर, घोळ, भराड या चार गावांचा समावेश होतो. तिची लोकसंख्या १० हजारापर्यंत आहे. तवा ग्रामपंचायतीत तवा, धामटणे, कोल्हाण, पेठ ही चार गावे आहेत. उर्से ग्रामपंचायतीत उर्से, साये, आंबिस्ते म्हसाड या चार गावांचा समावेश होतो. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, आंबिवली, निकावली ही तीन गावे आहेत.मुरबाड ग्रामपंचायतीत मुरबाड, वांगर्जे, पिंपळशेत गावे आहेत. महालक्ष्मी ग्रामपंचायतीत महालक्ष्मी, आंवढाणी, सोनाळे, खाणीव ही चार गावे समाविष्ट आहेत. ओसरविरा ग्रामपंचायतीत ओसरविरा, दहयाळे व कांदरवाडी ही तीन गावे आहेत. वेती ग्रामपंचायतीत वेती, वरोती, सुर्यानगर अशा तीन गावे मिळुन आहे. तर सदर गावांची लोकसंख्या तीन ते चार हजारापार्यंत आहे. दरम्यान याबाबत ग्रामसभेत विभाजनाचा प्रस्ताव घेऊन वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र त्यांची दखल घेत नसल्याचे प्रदिप पाटील यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीची निर्मिती ४० वर्षापूर्वी झाली. परंतु त्यानंतर लोकसंख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. तर ग्राम पंचायतीत समाविष्टगावे ही परस्परांपासून दूरवर आहेत. तर कार्यालय एक गावात असल्याने नागरिकांची मोठी अडचण होते.