शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

गोविंदा अडचणीत

By admin | Updated: March 3, 2017 05:53 IST

वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे

मुंबई : वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे समाजाची बदनामी केल्यासंदर्भात त्याच्यावर झारखंडमध्ये १९९६मध्येच गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र त्याला काही दिवसांपूर्वी तेथील दंडाधिकाऱ्यांनी ‘फरारी’ म्हणून घोषित केले. त्यामुळे गोविंदाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालय निकाल देणार आहे. या केसमध्ये गोविंदासह, आनंद-मिलिंद (गीतकार), अलका याज्ञिक (गायिका) आणि उदित नारायण यांनाही आरोपी करण्यात आले आहे.गोविंदाने केलेल्या याचिकेनुसार, तो गीतकार किंवा गायक नसून त्याने केवळ त्या गाण्यावर नृत्य केले आहे. कोणत्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नव्हता.‘पाकुरच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आपल्याला फरारी घोषित केल्यामुळे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनसाठी झारखंडला जावे लागेल. त्यामुळे तेथील पोलीस आपल्याला अटक करतील. या अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यात यावा,’ अशी मागणी गोविंदाने याचिकेद्वारे केली आहे.‘अर्जदार (गोविंदा) समाजात वावरत आहे. त्या चित्रपटानंतरही अनेक चित्रपटांत काम केले आहे, असे असतानाही दंडाधिकाऱ्यांनी अर्जदाराला फरारी म्हणून घोषित केले,’ असा युक्तिवाद गोविंदाच्या वकिलांनी न्या. साधना जाधव यांच्यासमोर केला. न्या. जाधव यांनीही त्यांच्या या युक्तिवादाशी सहमती दर्शवली. मात्र १९९६ला गुन्हा नोंदवूनही एवढ्या उशिरा गोविंदाने उच्च न्यायालयात धाव का घेतली, असा प्रश्न न्या. जाधव यांनी केला. त्यावर गोविंदाच्या वकिलांनी एवढी वर्षे याबद्दल काहीही माहीत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र उच्च न्यायालयाने हे मान्य करण्यास नकार देत गोविंदाच्या याचिकेवरील निकाल शुक्रवारी देऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी) >झारखंडमधील पाकुरमध्ये गुन्हा दाखल‘छोटे सरकार’मधील ‘एक चुम्मा तु मुझको उधार देदे और बदले मे यू.पी. बिहार लेले...’ या गाण्यामुळे यू.पी. व बिहारच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत झारखंड राज्यातील पाकुर येथे गोविंदावर गुन्हा नोंदविण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याला या केसमध्ये फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. या केसमध्ये गोविंदासह, गीतकार, गायक, गायिका यांनाही आरोपी करण्यात आले आहे.