शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा अद्यापि लटकलेलाच।

By admin | Updated: August 30, 2015 00:18 IST

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारने घेतला खरा, पण त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘लटकलेला गोविंदा सुटला’ असं म्हटलं जात

- शरद कद्रेकर

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारने घेतला खरा, पण त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘लटकलेला गोविंदा सुटला’ असं म्हटलं जात असलं तरी गोविंदा लटकलेलाच दिसतो आहे. मानवी मनोरे रचण्याच्या उत्सावाला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयास सरकारने घाईच केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुंबई, ठाण्यातील विविध गोविंदा पथकांची तसेच राजकीय पक्षांची धुसफुसही यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते. ठाण्यातील सुजाण नागरिकांनी ‘संघर्ष’ दहीहंडी यंदा होणार नसल्यामुळे शांततामय जल्लोष केला. ठाण्यातील हे लोण मुंबापुरीत कितपत पोहोचलं ते आठवडाभरात स्पष्ट होईल.महाराष्ट्राचे २0१२ मध्ये क्रीडा धोरण तयार करण्यात आले असून, त्यातील तरतुदींनुसार गोविंदा या मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नियुक्त केली. या समितीच्या अहवालातील शिफारशींवर क्रीडा, विधी व न्याय, बाल हक्क विभागांशी चर्चा करून सरकारने हा निर्णय घेतला. १२ वर्षांखालील मुलांना या खेळात सहभागी होता येणार नाही. १२ ते १५ वयोगटातील मुले सहभागी झाल्यास त्यांच्या पालकांकडून त्याबाबतचे संमतीपत्र भरून घेणे बंधनकारक असेल. साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेल्या या खेळात सहभागी होणाऱ्यांना उंचीचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. मात्र त्यांना ज्या अटी असतील त्या पाळाव्या लागतील. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी क्रीडा विभागावर नसेल. संबंधित विभागाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यात येईल. गोविंदासाठी हेल्मेट, सेफ्टी हार्मेस, मॅट्स, डॉक्टर्स, रुग्णवाहिका आदी सुरक्षाविषयक उपाययोजना बंधनकारक राहणार आहेत.दहीहंडी आठवड्यावर आली असताना दहीहंडी पथकांचा सराव सुरू आहे. गेल्यावर्षी १२ वर्षांखालील बालगोविंदांना या खेळातील सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय बाल हक्क आयोगाने घेतला होता. परंतु सरावाची सबब पुढे करीत मंडळांनी विरोध केला. यंदा मात्र सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. तसेच न्यायालयाच्या निकषांप्रमाणे दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध आणले. सरकारच्या या अटीचे पालन कितपत होते ते बघायचे. विविध मंडळांमध्ये नियमांबाबत नाराजीचा सूर असला तरी आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी मंडळ दक्षता बाळगतील अशी आशा आहे. ९0च्या दशकानंतर दहीहंडीचे स्वरूप पालटले. मानवी मनोऱ्यांचे उंच उंच थर लावून दहीहंडी फोडणाऱ्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. प्रायोजकांच्या आक्रमणामुळे बक्षिसांची रक्कम फुगली. शेकडो, हजारोंच्या घरातील बक्षिसे लाखोंमध्ये (कागदोपत्री) गेली. पूर्वी गोविंदांमध्ये रथांवर देखावे असत. कर्णकर्कश गोंगाट नसे. परंतु अलीकडे गोविंदा ट्रक तसेच टू-व्हीलरचा सर्रास वापर करतात. यासोबत कानठळ्या बसवणारा डीजे असतोच, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तर होतेच तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय होते. कामाचा ताण असलेल्या पोलीस दलावर दडपण तर येतेच. आणि केवळ बघ्याचीच भूमिका त्यांना वठवावी लागते.