शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
2
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
3
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
4
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
6
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
7
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
8
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
9
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
10
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
11
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
12
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
13
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
14
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
15
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
16
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
17
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
18
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
19
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
20
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन

By admin | Updated: March 23, 2017 03:33 IST

ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचे परखड भाष्यकार गोविंद तळवलकर यांचे मंगळवारी रात्री अमेरिकेत क्लीव्हलँड येथे राहत्या घरी निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचे परखड भाष्यकार गोविंद तळवलकर यांचे मंगळवारी रात्री अमेरिकेत क्लीव्हलँड येथे राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेमधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व दोन पिढ्यांचा विद्वान मार्गदर्शक हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवरांनी तळवलकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तळवलकर यांच्या निधनाने पत्रकारितेचे मोठेच नुकसान झाले आहे, असे विजय दर्डा म्हणाले. त्यांच्या निधनाने अभ्यासू विश्लेषक संपादकाला महाराष्ट्र मुकला आहे, असे शरद पवार म्हणाले.तळवलकर यांच्या पश्चात दोन कन्या आहेत. त्यांंचे वास्तव्य गेली अनेक वर्षे अमेरिकेत कन्यांकडे होते. बराच काळ तळवलकर वृद्धापकाळाशी निगडित व्याधींनी आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शरीर थकले होते तरी तळवळकर यांच्या बुद्धीची कुशाग्रता व त्यांचा पत्रकाराचा पिंड शेवटपर्यंत कायम होता. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेल्या अनपेक्षित विजयाचे मार्मिक विश्लेषण करणारा तळवलकर यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. वयाची नव्वदी गाठल्यावरही तळवलकर यांनी जपान, रशिया अणि इंग्लंडमधील शासकीय अभिलेखांचा अभ्यास करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन विमान अपघातातच झाले होते, हे सप्रमाण जगापुढे मांडले होते.डोंबिवलीत जन्मलेल्या तळवलकर यांनी १९४७ ते १९९६ अशी तब्बल पन्नास वर्षे निष्ठेने व विचारप्रवर्तक पत्रकारिता केली. त्यापैकी ‘दै महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकपदाचा तब्बल २७ वर्षांचा कालखंड विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. त्यांचे लिखाण अत्यंत परखड, निर्भिड आणि अभिजात दर्जाचे होते. त्याला प्रचंड व्यासंग व समतोल विचाराची खोली असे. भाषेवरील प्रभुत्व व साधी, सोपी लेखनशैली यामुळे त्यांचे लिख़ाण विद्वत्तापूर्ण असूनही बोजड वाटत नसे. त्यांनी इंग्रजीतही खूप लिखाण केले आहे.वृत्तपत्रीय लिखाणाखेरीज तळवलकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर मराठी आणि इंग्रजीतून विपूल लिखाण केले. त्यांची २५ प्रकाशित पुस्तके याची साक्ष देतात. त्यांच्यावर लोकमान्य टिळक आणि थोर मानवतावादी एम. एन. रॉय यांच्या लिखाणाचा प्रभाव होता. तळवलर यांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले. अमेरिकेत गेल्यानंतर तळवलकर यांनी ‘लोकमत’साठीही प्रासंगिक विषयांवर अनेक वेळा लिखाण केले होते.तळवलकर यांना असंख्य पुरस्कार व सन्मान मिळाले. त्यात उत्कृष्ठ पत्रकारितेसाठीचे ‘दुर्गा रतन’ व ‘रामनाथ गोएंका’ पुरस्कार, उत्कृष्ठ साहित्यकृतीसाठी न. चि. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश होता.(विशेष प्रतिनिधी)---------------