शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शासनकर्त्यांचा आरोपींना पाठिंबा - बाबा आढाव

By admin | Updated: June 20, 2016 21:59 IST

सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० -  सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला. 
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला आज ३४ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या हत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते.  महर्षी शिंदे पूलावर दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ता दाभोळकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, आम आदमी पार्टीचे सुभाष वारे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
सध्या या प्रकरणातील इतके आरोपी पकडले गेलेले असताना मुख्यमंत्री याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. खडसे किंवा इतर बाबतीत मुख्यमंत्री बोलतात मात्र दाभोळकर यांच्या हत्येविषयी ते काहीच का बोलत नाहीत हा खरा प्रश्न आहे. मालेगाव बॉंबस्फोटासारखीच फसवणूक याबाबतही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने आणि आत्मीयतेने पहाण्याची आवश्यकता आहे. अशा वातावरणात प्रबोधनाची चळवळ कशी चलवायची हा प्रश्न आहे. या आरोपींची पाळेमुळे ही गोवा, कर्नाटक याठिकाणी आहेत. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लढण्याच्या गोष्टी सरकार करत असेल तर अंतर्गत असणाºया राष्ट्रीय प्रश्नाचे काय असा प्रश्नही बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
यावेळी मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. दाभोलकर यांच्या हत्येला ३४ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणातील साक्षीदारांना योग्य ते सरंक्षण देण्याची गरज असून या घटनेकडे पहाण्याचा सरकारचा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे असेही त्या म्हणाल्या. या घटनेच्या मूळापर्यंत जाणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांविरोधी काम करणाºया लोकांना अशाप्रकारे आरोपी सापडत नसतील तर ही अतिशय अवघड गोष्ट आहे. 
सुभाष वारे म्हणाले, न्यायालयाने सरकारी तपास यंत्रणेच्या कानाखाली आवाज काढल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सरकारचा या प्रकरणाबाबत दुटप्पी भूमिका असल्याने येत्या काळात जनतेला दबाव निर्माण करावा लागेल.  त्यामुळे सरकारने वेळीच योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आमचा विवेकी मार्गही येत्या काळात सरकारला महागात पडेल. सरकारने अजूनही गभीरपणे या प्रकरणाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. 
मालेगाव, मडगाव, ठाणे अशा विविध ठिकाणी बॉंबस्फोटाच्या घटना घडल्या तेव्हाच या संघटनेवर बंदी घातली असती तर आज दाभोळकर, कॉम्रेड पानसरे व कलबुर्गी यांच्यासारखी माणसे गमावण्याची वेळ आपल्यावर आली नसती त्यामुळे या संघटनेवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी राष्ट्र सेवा दलातर्फे याठिकाणी करण्यात आली.