शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श घोटाळ्यात राज्यपालांचा निर्णय पक्षपाती, अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:14 IST

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर खटला भरण्यास सीबीआयला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून तो राजकीय हेतूने घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई : आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर खटला भरण्यास सीबीआयला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून तो राजकीय हेतूने घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला आहे.आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांनी २०१३मध्ये नकार दिला. त्यानंतर राज्यात सरकार बदलल्यानंतर सीबीआयने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे यासंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर निर्णय घेताना राज्यपालांनी सीबीआयला हिरवा कंदील दाखवत चव्हाण यांच्यावर खटला भरण्याचा मार्ग मोकळा केला. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सोमवारी होती.पुराव्यात बदल झाला म्हणून अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत, तर राज्यातील राजकीय स्थिती बदलल्याने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. राव यांचा निर्णय पक्षपाती असून राजकीय हेतूने घेण्यात आला, असा युक्तिवाद अशोक चव्हाण यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला.डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपालांनी खटला भरण्यास नकार दिला तेव्हा सीबीआयने खा. चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावे, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयला निर्णय अयोग्य वाटत होता, तर त्यांनी वेळीच त्याला न्यायालयात आव्हान द्यायला हवे होते, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.उच्च न्यायालयाने २०१४मध्ये चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास नकार दिला, तेव्हा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला पत्र लिहून राज्यपालांकडे फेरविचार अर्ज करण्याची सूचना केली. भाजपा सत्तेत आल्यावर सरकारच्या वतीने सीबीआयने राज्यपालांना यापूर्वी दिलेल्या आदेशाचा फेरविचार करण्याची विनंती केली. सीबीआयने स्वत:हून अर्ज केला नाही. हे राजकीय हेतूने केले आहे, असे देसाई यांनी सांगितले. राज्यपालांचा आदेश प्रशासकीय असून त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात येईल, असे देसाई म्हणाले. या याचिकेवर मंगळवारी पुढील सुनावणी होईल.