शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आदर्श घोटाळ्यात राज्यपालांचा निर्णय पक्षपाती, अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:14 IST

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर खटला भरण्यास सीबीआयला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून तो राजकीय हेतूने घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई : आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर खटला भरण्यास सीबीआयला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून तो राजकीय हेतूने घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला आहे.आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांनी २०१३मध्ये नकार दिला. त्यानंतर राज्यात सरकार बदलल्यानंतर सीबीआयने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे यासंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर निर्णय घेताना राज्यपालांनी सीबीआयला हिरवा कंदील दाखवत चव्हाण यांच्यावर खटला भरण्याचा मार्ग मोकळा केला. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सोमवारी होती.पुराव्यात बदल झाला म्हणून अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत, तर राज्यातील राजकीय स्थिती बदलल्याने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. राव यांचा निर्णय पक्षपाती असून राजकीय हेतूने घेण्यात आला, असा युक्तिवाद अशोक चव्हाण यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला.डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपालांनी खटला भरण्यास नकार दिला तेव्हा सीबीआयने खा. चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावे, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयला निर्णय अयोग्य वाटत होता, तर त्यांनी वेळीच त्याला न्यायालयात आव्हान द्यायला हवे होते, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.उच्च न्यायालयाने २०१४मध्ये चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास नकार दिला, तेव्हा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला पत्र लिहून राज्यपालांकडे फेरविचार अर्ज करण्याची सूचना केली. भाजपा सत्तेत आल्यावर सरकारच्या वतीने सीबीआयने राज्यपालांना यापूर्वी दिलेल्या आदेशाचा फेरविचार करण्याची विनंती केली. सीबीआयने स्वत:हून अर्ज केला नाही. हे राजकीय हेतूने केले आहे, असे देसाई यांनी सांगितले. राज्यपालांचा आदेश प्रशासकीय असून त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात येईल, असे देसाई म्हणाले. या याचिकेवर मंगळवारी पुढील सुनावणी होईल.