शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांची राज्यपालांकडून दखल

By admin | Updated: June 29, 2015 03:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची रविवारी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची रविवारी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांवर होत असलेले बनावट पदव्यांचे व भ्रष्टाचाराचे आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही बड्या अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई आणि १५ दिवसांनी होणारे पावसाळी अधिवेशन अशा काही प्रमुख मुद्द्यांवर या वेळी उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.फडणवीस यांनी रविवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी राज्यपालांची भेट घेतली. २ वाजून ४० मिनिटांनी ते ही भेट संपवून बाहेर पडले. या वेळी केवळ मुख्यमंत्री व राज्यपाल हेच हजर होते. अन्य कुठलाही अधिकारी या वेळी हजर नव्हता. राज्य सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पदवीचा वाद निर्माण झाला. तावडे हे शालेय शिक्षण विभागापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व खात्याचे मंत्री असून त्यांचीच पदवी वादात सापडल्याने सरकारची बेअब्रू झाल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील काही मंडळींनी राज्यपालांपर्यंत पोहोचवली आहे. राज्यपाल हे कुलपती असल्याने त्यांनी दोन मंत्र्यांच्या पदवी वादाबाबत मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या खात्यात केलेल्या २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या वादग्रस्त खरेदीचे प्रकरण काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहोचवले आहे. यापूर्वी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासंबंधीचे प्रकरणही याच खात्याकडे चौकशीला गेले होते. तक्रारदार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी धमक्या दिल्या जात आहेत. यासंदर्भातही राज्यपालांनी चर्चा केल्याचे समजते.मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लंडनमध्ये वादग्रस्त ललित मोदींची घेतलेली भेट व या भेटीची कबुली दिल्यानंतरही सरकारने त्यांना दिलेली क्लीन चिट यासंबंधातही उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेली कारवाई याबाबतही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याचे कळते. या घोटाळ्यात अडकलेले व निलंबनाची कारवाई झालेले माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या नियुक्तीबाबतही राज्यपालांनी माहिती घेतल्याचे कळते. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ दिवसांवर आले असून, या अधिवेशनात सादर होणारी नवी विधेयके व सध्याच्या अध्यादेशांना विधेयक स्वरूपात मंजुरी घेणे यावर बैठकीत विचारविमर्श केला गेला. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री अमेरिकावारीवरमुख्यमंत्री सोमवारपासून आठवडाभराच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आणणे हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याने या दौऱ्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. राज्यपालांनी या दौऱ्याकरिता शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व अन्य अधिकारी सहभागी होणार आहेत. फडणवीस यांनी रविवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी राज्यपालांची भेट घेतली. २ वाजून ४० मिनिटांनी ते ही भेट संपवून बाहेर पडले. या वेळी केवळ मुख्यमंत्री व राज्यपाल हेच हजर होते.