शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कलंकित मंत्र्यांवरून सरकारची कोंडी

By admin | Updated: July 27, 2016 05:02 IST

सत्ताधारी पक्षाची विधान परिषदेत चांगलीच कोंडी झाली असून, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी जाहीर करा, या मागणीसाठी दोन दिवस विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज

- अतुल कुलकर्णी, मुंबई

सत्ताधारी पक्षाची विधान परिषदेत चांगलीच कोंडी झाली असून, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी जाहीर करा, या मागणीसाठी दोन दिवस विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारीही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.युती सरकारमधील २० मंत्री कलंकित आहेत, असा आरोप करत दोन्ही सभागृहांत या विषयावरील चर्चा लावण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चातुर्य दाखवत विधानसभेत सर्व मंत्र्यांच्या वतीने उत्तर देत सगळ्यांना क्लीन चिट दिली होती. विधान परिषदेत मात्र ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्या त्या मंत्र्यांनी आपापली बाजू मांडली. विरोधकांनी केलेले आरोप कितीही गंभीर असले तरीही ‘पुरावे द्या, पुरावे द्या, विनापुराव्याचे आरोप करू नका’, अशी मागणी करत विरोधकांच्या मागणीला भीक न घालण्याची व्यूहरचना सत्ता पक्षाने आखली. त्यामुळे विरोधकांनी आता आपली रणनीती बदलली आहे.बैठकीतही तोडगा नाहीचमंत्र्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही तर घाबरता कशाला, चौकशी जाहीर करा. त्यातून सत्य समोर येईलच, अशी आमची मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. कामकाज ठप्प झाल्यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेऊन पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत, सभागृहात बिले आहेत, तेव्हा सभागृह चालू ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर सभापतींनी गटनेत्यांची बैठक घेतली. त्यातही तोडगा निघाला नाही. विरोधक आपल्या मागणीवर ठामबुधवारी तरी विधान परिषदेचे कामकाज चालू व्हावे यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. मुंडे यांच्या बंगल्यावर विरोधकांंची बैठक झाली. त्यात जोपर्यंत चौकशी समिती जाहीर होत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.कलंकित मंत्र्यांबाबत सर्व पुरावे सभागृहात सादर केले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट दिली गेली. आरोप असलेले मंत्री स्वत:लाच निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी आयोग नेमून भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी केली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद