शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

कलंकित मंत्र्यांवरून सरकारची कोंडी

By admin | Updated: July 27, 2016 05:02 IST

सत्ताधारी पक्षाची विधान परिषदेत चांगलीच कोंडी झाली असून, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी जाहीर करा, या मागणीसाठी दोन दिवस विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज

- अतुल कुलकर्णी, मुंबई

सत्ताधारी पक्षाची विधान परिषदेत चांगलीच कोंडी झाली असून, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी जाहीर करा, या मागणीसाठी दोन दिवस विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारीही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.युती सरकारमधील २० मंत्री कलंकित आहेत, असा आरोप करत दोन्ही सभागृहांत या विषयावरील चर्चा लावण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चातुर्य दाखवत विधानसभेत सर्व मंत्र्यांच्या वतीने उत्तर देत सगळ्यांना क्लीन चिट दिली होती. विधान परिषदेत मात्र ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्या त्या मंत्र्यांनी आपापली बाजू मांडली. विरोधकांनी केलेले आरोप कितीही गंभीर असले तरीही ‘पुरावे द्या, पुरावे द्या, विनापुराव्याचे आरोप करू नका’, अशी मागणी करत विरोधकांच्या मागणीला भीक न घालण्याची व्यूहरचना सत्ता पक्षाने आखली. त्यामुळे विरोधकांनी आता आपली रणनीती बदलली आहे.बैठकीतही तोडगा नाहीचमंत्र्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही तर घाबरता कशाला, चौकशी जाहीर करा. त्यातून सत्य समोर येईलच, अशी आमची मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. कामकाज ठप्प झाल्यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेऊन पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत, सभागृहात बिले आहेत, तेव्हा सभागृह चालू ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर सभापतींनी गटनेत्यांची बैठक घेतली. त्यातही तोडगा निघाला नाही. विरोधक आपल्या मागणीवर ठामबुधवारी तरी विधान परिषदेचे कामकाज चालू व्हावे यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. मुंडे यांच्या बंगल्यावर विरोधकांंची बैठक झाली. त्यात जोपर्यंत चौकशी समिती जाहीर होत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.कलंकित मंत्र्यांबाबत सर्व पुरावे सभागृहात सादर केले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट दिली गेली. आरोप असलेले मंत्री स्वत:लाच निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी आयोग नेमून भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी केली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद