शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

ज्येष्ठ नागरिक धोरणाला सरकारचा हरताळ

By admin | Updated: October 3, 2016 03:04 IST

ज्येष्ठांना सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयी, निवास आणि सुरक्षेविषयी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- ज्येष्ठांना सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयी, निवास आणि सुरक्षेविषयी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता ३० सप्टेंबर २०१३ रोजी राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्यात आले. तीन वर्षे उलटूनही या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. ज्येष्ठ नागरिक संघटनांशी चर्चा न करता शासनाने या धोरणामध्ये आक्षेपार्ह बदल केलेले असून ते दूर करून त्वरित अमलात आणावे, अशी मागणी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने केली आहे. भारतातील २८ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये महाराष्ट्र राज्याचा अव्वल क्रमांक असून यामध्ये एकूण ३ हजार ८०० संघटना आहेत आणि २९० महिला संघांचा समावेश आहे.देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ कोटी इतकी आहे, ही संख्या प्रतिदिनी वाढत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार २०५० साली ही संख्या ३२ कोटी ५० लक्ष इतकी होणार आहे. महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी १६ लाख इतकी आणि २०५० साली ही संख्या ३.५ कोटीवर पोहोचेल. केंद्र शासनाने १९९९मध्ये राष्ट्रीय वृध्दजन नीती जाहीर केली. त्याच धर्तीवर राज्यांनी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करावे अशी केंद्र सरकारची सूचना होती. यातून २०१३ साली ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर मात्र ज्येष्ठ नागरिक संघटनांना विश्वासात न घेता या धोरणात आक्षेपार्ह बदल केल्याचा आरोप राज्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केला. महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात १५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेली आश्वासने कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणीला मुहूर्त मिळत नसल्याची टीका महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येतील वयोमर्यादा ६५ वर्षांवरून ६० वर्षे इतकी करण्यात येईल, निवृत्तिवेतनात १००० रु.पर्यंत वाढ, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती महिनाभरात स्थापन करणार, ज्येष्ठांना राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश करणे आदी आश्वासने देऊन १० महिने उलटूनही कार्यवाही न झाल्याने ज्येष्ठ नागरिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.>महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या१ कोटी १६ लाख ज्येष्ठ महिला - ५३ टक्केपुरुष - ४७ टक्केज्येष्ठ नागरिक संघटना ३ हजार ८०० महिला संघटना - २९०>प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठांचे वॉकेथॉनज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत १ आॅक्टोबर रोजी देशभरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथे होणाऱ्या वॉकेथॉनच्या माध्यमातून महत्त्वाच्या मागण्या सोडवून ज्येष्ठांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली जाणार आहे.>देशाकरिता ज्येष्ठांचे मोठे योगदान असल्याने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दृष्टीने ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, उर्वरित आयुष्य सुरक्षितरीत्या जगता यावे, पेन्शन वाढावी,आरोग्य सुविधा, विमा कवच मिळावे आदी मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शासकीय पातळीवर उपेक्षा होत आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांनाही पेन्शनचा लाभ घेता यावा, तसेच पोलिसांकडून हेल्पलाइनची सुविधा पुरविण्यात यावी. - डॉ. एस. पी. किंजवडेकर, ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष>या निष्क्रिय शासनाला कधी जाग येणार आहे? सद्यस्थितीत ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, कुटुंबाकडून छळ केला जातो. याप्रकरणी शासनाला जागे करण्यासाठी लवकरच राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तालुका स्तरावर आंदोलन छेडले जाणार आहे. प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, ही प्रमुख मागणी असणार आहे.-डी.एन.चापके, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष