शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

‘कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव’

By admin | Updated: May 2, 2017 04:09 IST

उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार

मुंबई : उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असून काँग्रेस पक्ष कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर टिळक भवन येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारने केलेल्या विकास कामांमुळे महाराष्ट्र प्रगत राज्य झाले. काँग्रेस सरकारने राबविलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्याची भरभराट झाली. लोकांना रोजगार मिळाला. काँग्रेस सरकारने कायम कामगारांच्या हिताचे रक्षण केले. पण केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष कामगारांच्या व कष्टकऱ्यांच्या हितासाठी या सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करेल, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्रातले सरकार कामगारांच्या सुरक्षेवर हल्ला करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकृष्ण ओझा यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)