शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

सरकारचा बेजबाबदारपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 02:09 IST

कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते

नाशिक : कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कांद्याचे भाव वाढण्यास व्यापाऱ्यांची साठेबाजी कारणीभूत असून, त्यांच्याविरुद्ध राज्य शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त एका आखाड्याच्या ध्वजारोहणप्रसंगी नाशकात आले असता विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ कांदाप्रश्नीच नव्हेतर, राज्यातील दुष्काळप्रश्नीदेखील राज्य सरकारची निष्क्रियता सिद्ध झाली असून, कोणताही मंत्री दुष्काळी दौरा करताना दिसत नाही.राज्यात फक्त ३५ टक्के पाऊस झाला असून, यापुढे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत अडवणूक करू नये. कांद्याची साठेबाजी करणाऱ्या दलालावर त्वरित कारवाई करावी आणि ग्राहकांना योग्य भावात कांदा उपलब्ध व्हावा, असेही ते म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शाहीस्नानासाठी पाणी सोडताना व्यापक हिताचा विचार करूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.