शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

सरकारचा बेजबाबदारपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 02:09 IST

कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते

नाशिक : कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कांद्याचे भाव वाढण्यास व्यापाऱ्यांची साठेबाजी कारणीभूत असून, त्यांच्याविरुद्ध राज्य शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त एका आखाड्याच्या ध्वजारोहणप्रसंगी नाशकात आले असता विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ कांदाप्रश्नीच नव्हेतर, राज्यातील दुष्काळप्रश्नीदेखील राज्य सरकारची निष्क्रियता सिद्ध झाली असून, कोणताही मंत्री दुष्काळी दौरा करताना दिसत नाही.राज्यात फक्त ३५ टक्के पाऊस झाला असून, यापुढे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत अडवणूक करू नये. कांद्याची साठेबाजी करणाऱ्या दलालावर त्वरित कारवाई करावी आणि ग्राहकांना योग्य भावात कांदा उपलब्ध व्हावा, असेही ते म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शाहीस्नानासाठी पाणी सोडताना व्यापक हिताचा विचार करूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.