शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

पाकीटमारांच्या हाती राज्याचा कारभार

By admin | Updated: October 6, 2015 02:12 IST

भाजपा-सेनेमध्ये कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नाही़ करवाढीवरून शिवसेनेने त्यांच्याच मित्रपक्षाला पाकीटमार म्हटले आहे, मात्र राज्याचा कारभार सध्या

अहमदनगर : भाजपा-सेनेमध्ये कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नाही़ करवाढीवरून शिवसेनेने त्यांच्याच मित्रपक्षाला पाकीटमार म्हटले आहे, मात्र राज्याचा कारभार सध्या या पाकीटमारांच्या हाती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.दोन्ही पक्षांतील कुणी टक्केवारीचा तर कुणी खिसेकापूचा आरोप करीत आहेत. सेना नेत्यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टॅब दाखविला़ राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना ही मंडळी पंतप्रधानांना टॅब दाखवित फिरत आहेत. सेनेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदींची भेट घ्यायला हवी होती, असे विखे म्हणाले़ राज्यात वीज पडून पाच दिवसांत ४०-४२ जणांचा मृत्यू झाला़ आघाडी सरकारच्या काळात वीजरोधक यंत्र बसविण्याची योजना आखली होती, त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूदही केली. मात्र सध्याच्या सरकारने या योजनेचे काय केले, ते माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ शीना बोरा प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बड्या नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.