शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वाघ यांच्या संस्थेवर सरकारी कृपा

By admin | Updated: December 23, 2015 02:01 IST

मुंबईच्या दीक्षा सामाजिक संस्थेला निविदेविनाच शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा करण्याची कंत्राटे वारंवार देण्यात आल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे.

यदु जोशी,  मुंबईमुंबईच्या दीक्षा सामाजिक संस्थेला निविदेविनाच शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा करण्याची कंत्राटे वारंवार देण्यात आल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. निविदा काढून कंत्राट दिले असते तर चांगल्या प्रतीचे व लघुत्तम दराने अन्नधान्य मिळाले असते आणि शासनाच्या पैशात बचत झाली असती, असे या अहवालात म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत हा अहवाल सादर केला. लोकमतने सोमवारच्या अंकात या घोटाळ्यावर प्रकाश टाकला होता. राज्य कर्मचारी, आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अन्नधान्य पुरवठ्यातील घोटाळ्याची चौकशी करून राज्य शासनाला हा अहवाल सादर केला होता. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे संचालक पीयूष सिंह हे समितीचे सचिव तर शेखर ढवळे हे सदस्य सचिव होते. चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कर्मचारी आरोग्य विमा योजनेच्या रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याचे कंत्राट २००९ पासून पाच-सहा वर्षे देण्यात आले होते. या संस्थेची पुरवठा करण्याची दरवर्षी क्षमता आहे का़?, कराराला दरवर्षी मुदतवाढ दिली आहे का?, याची तपासणी करण्याच्या कोणत्याही सूचना शासनाने संबंधित रुग्णालयांना दिल्या नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. दीक्षा सामाजिक संस्थेला अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देताना वित्तीय तसेच खरेदी धोरणास बगल देण्यात आली. निविदा न काढता दीक्षा संस्थेलाच कंत्राट देण्याचा शासकीय निर्णय दोषपूर्णच होता. जीआरमध्ये नमूद केलेल्या पाच संस्थांपैकी दोन संस्थांकडून अन्नधान्याचे दर मागवावेत आणि त्यापैकी सरासरी दर स्वीकारावेत, असा अफलातून आदेश काढण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की त्याऐवजी, पाच संस्थांपैकी ज्या संस्थेचे दर कमीतकमी आहेत त्या दराने खरेदी केली असती तर शासनाचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचला असता. रक्कम प्रदान करताना लावलेल्या दरात तफावतदीक्षा संस्थेला त्यांचे काम समाधानकारक असेपर्यंत पुरवठ्याचे काम द्यावे, असे जीआरमध्ये म्हटले होते. तथापि, हे काम समाधानकारक आहे किंवा नाही हे दरवर्षी ठरवून नंतरच मुदतवाढ द्यायला हवी होती पण तसे केल्याचे दिसून येत नाही.अन्नधान्याचे तत्कालीन सरासरी दर आणि दीक्षा संस्थेला रक्कम प्रदान करताना लावलेले दर यातील फरकाच्या रकमेची वसुली दीक्षा संस्थेकडून करायची की नाही या बाबतचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, असेही अहवालात म्हटले आहे.