शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

वाघ यांच्या संस्थेवर सरकारी कृपा

By admin | Updated: December 23, 2015 02:01 IST

मुंबईच्या दीक्षा सामाजिक संस्थेला निविदेविनाच शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा करण्याची कंत्राटे वारंवार देण्यात आल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे.

यदु जोशी,  मुंबईमुंबईच्या दीक्षा सामाजिक संस्थेला निविदेविनाच शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा करण्याची कंत्राटे वारंवार देण्यात आल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. निविदा काढून कंत्राट दिले असते तर चांगल्या प्रतीचे व लघुत्तम दराने अन्नधान्य मिळाले असते आणि शासनाच्या पैशात बचत झाली असती, असे या अहवालात म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत हा अहवाल सादर केला. लोकमतने सोमवारच्या अंकात या घोटाळ्यावर प्रकाश टाकला होता. राज्य कर्मचारी, आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अन्नधान्य पुरवठ्यातील घोटाळ्याची चौकशी करून राज्य शासनाला हा अहवाल सादर केला होता. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे संचालक पीयूष सिंह हे समितीचे सचिव तर शेखर ढवळे हे सदस्य सचिव होते. चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कर्मचारी आरोग्य विमा योजनेच्या रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याचे कंत्राट २००९ पासून पाच-सहा वर्षे देण्यात आले होते. या संस्थेची पुरवठा करण्याची दरवर्षी क्षमता आहे का़?, कराराला दरवर्षी मुदतवाढ दिली आहे का?, याची तपासणी करण्याच्या कोणत्याही सूचना शासनाने संबंधित रुग्णालयांना दिल्या नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. दीक्षा सामाजिक संस्थेला अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देताना वित्तीय तसेच खरेदी धोरणास बगल देण्यात आली. निविदा न काढता दीक्षा संस्थेलाच कंत्राट देण्याचा शासकीय निर्णय दोषपूर्णच होता. जीआरमध्ये नमूद केलेल्या पाच संस्थांपैकी दोन संस्थांकडून अन्नधान्याचे दर मागवावेत आणि त्यापैकी सरासरी दर स्वीकारावेत, असा अफलातून आदेश काढण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की त्याऐवजी, पाच संस्थांपैकी ज्या संस्थेचे दर कमीतकमी आहेत त्या दराने खरेदी केली असती तर शासनाचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचला असता. रक्कम प्रदान करताना लावलेल्या दरात तफावतदीक्षा संस्थेला त्यांचे काम समाधानकारक असेपर्यंत पुरवठ्याचे काम द्यावे, असे जीआरमध्ये म्हटले होते. तथापि, हे काम समाधानकारक आहे किंवा नाही हे दरवर्षी ठरवून नंतरच मुदतवाढ द्यायला हवी होती पण तसे केल्याचे दिसून येत नाही.अन्नधान्याचे तत्कालीन सरासरी दर आणि दीक्षा संस्थेला रक्कम प्रदान करताना लावलेले दर यातील फरकाच्या रकमेची वसुली दीक्षा संस्थेकडून करायची की नाही या बाबतचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, असेही अहवालात म्हटले आहे.