शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पणन चळवळ मोडीत काढण्याचे सरकारचे प्रयत्न

By admin | Updated: July 28, 2016 04:34 IST

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याऐवजी एकूण पणन चळवळ मोडीत काढण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला.

- अजित पवार यांनी केला आरोपमुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याऐवजी एकूण पणन चळवळ मोडीत काढण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. या समितीवर बाहेरुन तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यकर्त्यांना घुसविण्याचा प्रयत्न असून तो लोकशाहीला काळीमा फासणारा आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) दुरुस्ती विधेयकांवरील चर्चेवेळी पवार यांना हा आरोप केला. राज्यात चांगल्या चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. खरे तर शेतकरी हितासाठी या समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यांना चांगल्या पायाभुत सुविधा द्यायला पाहिजेत. जेथे गोदामे, शीतगृहे, लिलावगृहे नाहीत तेथे ती उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. परंतु भाजप लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळावर मागच्या दारातून राजकीय सोय म्हणून कार्यकर्त्याना तज्ज्ञ संचालक म्हणून नेमले जात असून हा लोकशाहीला काळीमा आहे, असे पवार म्हणाले. भाजीपाला नियमनमुक्तीवरून राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला होता, याची आठवणही करून दिली.खोत का ढेपाळले?- शेतकऱ्यांचे आक्रमक नेते असलेले सदाभाऊ खोत मंत्री झाले, त्यांच्याकडे कृषी व पणन खाते आहे. परंतु शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास खोत का ढेपाळले आहेत काही कळेना झालंय असे सांगत पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. या विषयावरील चर्चा लांबत जाईल तशी तालिका अध्यक्षांनी चर्चा सिमीत स्वरुपात करावी अशी सुचना करुनही चर्चा रात्री उशिरापर्यंत लांबत गेली.