शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सरकारची उदासीनता : यवतमाळची प्रियदर्शिनी सूतगिरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:43 IST

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १७ वर्षांत ३८५७ कापूस उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. परंतु राज्य सरकार कापूस पिकविणा-या शेतक-यांबाबत किती उदासीन आहे

सोपान पांढरीपांडे नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १७ वर्षांत ३८५७ कापूस उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. परंतु राज्य सरकार कापूस पिकविणा-या शेतक-यांबाबत किती उदासीन आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी आहे.प्रियदर्शिनी सूतगिरणीची मुहूर्तमेढ १९९१साली स्वतंत्रता सेनानी व  महाराष्ट्राचे माजी मंत्री जवाहरलालजी दर्डा यांनी रोवली. परंतु सरकारच्या असहकारामुळे १७ वर्षांनंतर, २००८ साली सूतगिरणीमध्ये उत्पादन सुरू झाले. त्यानंतर या गिरणीने आपली क्षमता १२००० चात्यांवरून २८७०० चात्यांपर्यंत वाढविली आणि त्यासाठी बँक आॅफ इंडियाकडून कर्जही उभे केले. पण बाजारातील स्पर्धा, जुने तंत्रज्ञान व सरकारी उदासीनता यामुळे ही गिरणी डिसेंबर २०१६पासून बंद आहे. सध्या या गिरणीचे अध्यक्ष लोकमतचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा आहेत, ही गिरणी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ते सध्या आटोकाट प्रयत्न करीत आहेत.या गिरणीसाठी प्रवर्तकांनी दीड कोटी रुपये भांडवल जमवले होते. गिरणीची प्रकल्प किंमत त्यावेळी ३६ कोटी होती. यात सरकारने १३.५० कोटी भांडवल द्यायचे होते व उर्वरित २१ कोटी बँकेकडून कर्जरूपाने उभारायचे होते. परंतु राज्य सरकारने आपला वाटा एकरकमी दिला नाही. त्यामुळे गिरणी सुरू व्हायला २००८ साल उजाडले. त्यानंतरही गिरणीने २०१३ सालापर्यंत आपली क्षमता वाढवली.प्रकल्प खर्च वाढवण्यात दिरंगाईसहकारी सूतगिरण्यांचा जो प्रकल्प खर्च असतो त्यात सरकारला प्रवर्तकांच्या भांडवलाच्या नऊपट रक्कम भांडवल म्हणून द्यावी लागते. त्यामुळे राज्य सरकार प्रकल्प खर्च वाढवून देण्यास अनुत्सुक असते. २०१३ साली प्रियदर्शिनी सूतगिरणीचा प्रकल्प खर्च ६३ कोटीवर गेला आहे. पण राज्य सरकारने वाढीव खर्चास मंजुरी दिलेली नाही. परिणामी राज्य सरकारकडे गिरणीचे १० ते ११ कोटी अडकून पडले आहेत.‘टफ’ सबसिडीचा घोळसर्व सूतगिरण्यांना कर्जावरील व्याजामध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड (टफ) योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ५ टक्के सबसिडी मिळते. याशिवाय राज्य सरकारकडून ७ टक्के व्याज अनुदान मिळते. प्रियदर्शिनी सूतगिरणीने २००७-०८ साली बँक आॅफ इंडियाकडून ११.९० कोटी कर्ज घेतले त्यावर ही व्याज सबसिडी मिळत आहे.परंतु नंतरच्या ४ कोटी व १८ कोटींच्या कर्जव्यवहाराची नोंद बँकेने केंद्र सरकारकडे केलेली नाही. त्यामुळे प्रियदर्शिनी गिरणीला २२ कोटींचे संपूर्ण व्याज भरावे लागत आहे. कर्ज परतफेडीपोटी गिरणीने आजवर बँकेला ५२ कोटी अदा केले आहे; तरी ३४ कोटी कर्ज अजूनही बाकी आहे. आज गिरणीला या अनुदानापोटी ६ ते ७ कोटी मिळणे बाकी आहे. टफ सबसिडीसाठी कर्ज न नोंदल्याच्या अक्षम्य चुकीसाठी गिरणीने बँक आॅफ इंडियाविरुद्ध कोर्टात खटलासुद्धा दाखल केला आहे.मे २०१५मध्ये गिरणीच्या ब्लोरूमला आग लागली व दोन कोटींचे नुकसान झाले. परंतु गिरणी तीन महिन्यांत पुन्हा सुरू करण्यात आली. पण स्थिती मूळ पदावर आली नाही. त्यामुळे संचालक मंडळाने आॅगस्ट २०१५मध्ये सूतगिरणी सेंधण्याच्या एका उद्योजकाला भाड्याने दिली. पण या उद्योजकाने कराराचे नूतनीकरण केले नाही. आज सुरतचा एक बडा उद्योगपती गिरणी भाड्याने घ्यायला तयार आहे. पण बँक आॅफ इंडियाने परवानगी रोखून धरली आहे.