शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शाहीस्नानसाठी पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर

By admin | Updated: December 23, 2016 04:53 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण

मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण २००३च्या अगदी विसंगत आहे, असा निर्णय गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा आदेश मुख्य सचिवांनी २८ जानेवारी २०१६ रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तथापि, हा आदेश जलधोरण २००३शी विसंगत असल्याने तो बेकायेशीर ठरतो, असे न्या. अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.दुष्काळी स्थितीत पाणी कशाप्रकारे सोडण्यात यावे, याबद्दलचा तपशील जलधोरण २००३मध्ये देण्यात आला आहे. पिण्यासाठी, दैनंदिन कामासाठी, शेतीसाठी, औद्योगिक कामाकरिता व त्यानंतर धार्मिक कारणासाठी पाणी सोडण्यात यावे, असे या धोरणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही राज्य सरकारने दुष्काळी स्थितीत पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसतानाही नाशिकच्या गंगापूर धरणातून कुंभमेळ््यातील शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला. या आदेशाला नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.देसरडा यांनी राज्य सरकारची जलयुक्तशिवार योजनाही योग्य पद्धतीने राबवली जात नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारच्या या योजनेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनाही हानी पोहचत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने यात आम्ही तज्ज्ञ नसल्याने राज्य सरकारकडे निवेदन करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना दिले. याचिकाकर्ते म्हणत असतील त्याप्रमाणे खरोखरच वैज्ञानिक पद्धतीने जलशिवार योजना राबवण्यात येत नसेल तर खरोखरच हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक समिती नेमावी. दुष्काळमुक्त राज्य निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)