शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

संप फोडण्याचा सरकारचा डाव

By admin | Updated: June 3, 2017 03:34 IST

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी संपावर गेला आहे. आता या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऐक्य टिकवून आंदोलन कायम ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, रस्त्यावर दूध ओतून, भाजीपाला व फळे टाकून निषेध करण्याऐवजी अन्य प्रकारे आंदोलन पुढे चालवावे. शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचे वाटप करावे आणि गावातील सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे हे देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व, पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने कर्जमाफी दिली; परंतु महाराष्ट्रातील भाजपा सरकार हाच न्याय येथील शेतकऱ्यांना लागू करत नाही. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.शेतकऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची वाट न पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे...शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला. शेतकऱ्याला जगवायचे असेल, तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असेही खा. चव्हाण म्हणाले.