शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संप फोडण्याचा सरकारचा डाव

By admin | Updated: June 3, 2017 03:34 IST

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी संपावर गेला आहे. आता या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऐक्य टिकवून आंदोलन कायम ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, रस्त्यावर दूध ओतून, भाजीपाला व फळे टाकून निषेध करण्याऐवजी अन्य प्रकारे आंदोलन पुढे चालवावे. शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचे वाटप करावे आणि गावातील सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे हे देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व, पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने कर्जमाफी दिली; परंतु महाराष्ट्रातील भाजपा सरकार हाच न्याय येथील शेतकऱ्यांना लागू करत नाही. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.शेतकऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची वाट न पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे...शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला. शेतकऱ्याला जगवायचे असेल, तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असेही खा. चव्हाण म्हणाले.