शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचे काम केले

By admin | Updated: June 1, 2017 01:37 IST

सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही जाग येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडण्याचं काम सध्याच्या सरकारने केले असल्याचा आरोप बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. ३०) दौंड तालुक्याच्या जिरायत भागाच्या दुष्काळी दौऱ्यावेळी बोलताना व्यक्त केले.त्यांनी तालुक्यातील जिरेगाव, कौठडी, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी या जिरायत पट्ट्यातील गावातील नागरिकांशी थेट संवाद साधून अडी-अडचणी समजावून घेतल्या. एकीकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच उपलब्ध पाण्यावर शेतामध्ये उत्पादित केलेल्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नसल्याने प्रपंच चालवायचा कसा? मुला-मुलींचे शिक्षण व लग्न करण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भागासाठी जनाई उपसा सिंचन योजनेतून वर्षभरात किमान दोन वेळा पाणी सोडण्यात यावे, तसेच या योजनेची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत, ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी टँकर उपलब्ध व्हावा, ओढा खोलीकरण व बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, तसेच गावातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा व इतर अनेक मागण्या केल्या.या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, सभापती मीनाताई धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, अप्पासाहेब पवार, गणेश कदम, नितीन दोरगे, लक्ष्मण सातपुते, सारिका पानसरे, उत्तम आटोळे, रामभाऊ चौधरी, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, वासुंदेच्या सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, हिंगणीगाडा गावच्या सरपंच अलका कदम, उपसरपंच रमेश खराडे, रोटीचे उपसरपंच विलास शितोळे आदी उपस्थित होते.सुळे यांनी लवकरात लवकर या मागण्या सोडविण्याचे आश्वासन देत, चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग येऊ दे, असा आशावाद व्यक्त केला.