शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचे काम केले

By admin | Updated: June 1, 2017 01:37 IST

सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही जाग येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडण्याचं काम सध्याच्या सरकारने केले असल्याचा आरोप बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. ३०) दौंड तालुक्याच्या जिरायत भागाच्या दुष्काळी दौऱ्यावेळी बोलताना व्यक्त केले.त्यांनी तालुक्यातील जिरेगाव, कौठडी, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी या जिरायत पट्ट्यातील गावातील नागरिकांशी थेट संवाद साधून अडी-अडचणी समजावून घेतल्या. एकीकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच उपलब्ध पाण्यावर शेतामध्ये उत्पादित केलेल्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नसल्याने प्रपंच चालवायचा कसा? मुला-मुलींचे शिक्षण व लग्न करण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भागासाठी जनाई उपसा सिंचन योजनेतून वर्षभरात किमान दोन वेळा पाणी सोडण्यात यावे, तसेच या योजनेची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत, ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी टँकर उपलब्ध व्हावा, ओढा खोलीकरण व बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, तसेच गावातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा व इतर अनेक मागण्या केल्या.या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, सभापती मीनाताई धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, अप्पासाहेब पवार, गणेश कदम, नितीन दोरगे, लक्ष्मण सातपुते, सारिका पानसरे, उत्तम आटोळे, रामभाऊ चौधरी, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, वासुंदेच्या सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, हिंगणीगाडा गावच्या सरपंच अलका कदम, उपसरपंच रमेश खराडे, रोटीचे उपसरपंच विलास शितोळे आदी उपस्थित होते.सुळे यांनी लवकरात लवकर या मागण्या सोडविण्याचे आश्वासन देत, चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग येऊ दे, असा आशावाद व्यक्त केला.