शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेशिवाय सरकार!

By admin | Updated: October 21, 2014 04:23 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. काही ‘उद्योगी’ मध्यस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्याचे समजते.विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. सरकार स्थापण्यास त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. मित्रपक्ष रासपकडे १ आमदार आहे. मनसे १, बहुजन विकास आघाडी ३, अपक्ष ७, भारिप-बहुजन महासंघ १ आणि शेकपाचे ३ अशा १५ जणांशी भाजपाने संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येते. सत्तास्थापनेस आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सूचक विधान भाजपाचे प्रभारी खा. ओमप्रकाश माथूर यांनी केले.नवे सरकार स्थापण्याबाबत पक्षाध्यक्ष शहा यांनी गडकरींसोबत विस्तृत चर्चा केली. गडकरींना मुंबईला पाठवावे असे भाजपश्रेष्ठींना वाटते, मात्र अद्याप गडकरींनी होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निकाल येताच भाजपाला बिनशर्त समर्थन देण्याची घोषणा केली. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गंमत म्हणजे भाजपाचा कोणताही नेता राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याची बाब बोलायला तयार नाही. गडकरी आणि प्रफुल्ल पटेल यांचा कायम संपर्क सुरू असल्याची माहितीही ‘लोकमत’ला मिळाली आहे. राजनाथसिंग आणि जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरविले होते. त्यांनी दौरा मंगळवारवर ढकलला. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपानेच घ्यावा, असे सांगत रा. स्व. संघानेही एकप्रकारे या नव्या राजकीय आघाडीला हिरवा कंदील दिला.