शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेनेशिवाय सरकार!

By admin | Updated: October 21, 2014 04:23 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. काही ‘उद्योगी’ मध्यस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्याचे समजते.विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. सरकार स्थापण्यास त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. मित्रपक्ष रासपकडे १ आमदार आहे. मनसे १, बहुजन विकास आघाडी ३, अपक्ष ७, भारिप-बहुजन महासंघ १ आणि शेकपाचे ३ अशा १५ जणांशी भाजपाने संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येते. सत्तास्थापनेस आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सूचक विधान भाजपाचे प्रभारी खा. ओमप्रकाश माथूर यांनी केले.नवे सरकार स्थापण्याबाबत पक्षाध्यक्ष शहा यांनी गडकरींसोबत विस्तृत चर्चा केली. गडकरींना मुंबईला पाठवावे असे भाजपश्रेष्ठींना वाटते, मात्र अद्याप गडकरींनी होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निकाल येताच भाजपाला बिनशर्त समर्थन देण्याची घोषणा केली. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गंमत म्हणजे भाजपाचा कोणताही नेता राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याची बाब बोलायला तयार नाही. गडकरी आणि प्रफुल्ल पटेल यांचा कायम संपर्क सुरू असल्याची माहितीही ‘लोकमत’ला मिळाली आहे. राजनाथसिंग आणि जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरविले होते. त्यांनी दौरा मंगळवारवर ढकलला. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपानेच घ्यावा, असे सांगत रा. स्व. संघानेही एकप्रकारे या नव्या राजकीय आघाडीला हिरवा कंदील दिला.