शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांना सरकार देणार २० हजार कोटी रुपये?

By admin | Updated: May 8, 2014 23:33 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार या वर्षात या बॅँकांना २० हजार कोटी रुपये देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार या वर्षात या बॅँकांना २० हजार कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात ११ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बॅँकांना पुरेसे भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बॅँकांनी भांडवल विक्रीच्या पर्यायाचा वापर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना सरकारला या वर्षात सुमारे २५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे लागण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आगामी अर्थसंकल्पात यासाठी १८ ते २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एका अधिकार्‍याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर दिली. बॅँकांना गरजेची असलेली उर्वरित रक्कम खासगी गुंतवणूकदारांना समभागांची विक्री करून मिळविण्यास बॅँकांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी बॅँकांनी आपली अनुत्पादक मालमत्ता कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. बॅँकांच्या कर्जवितरणामध्ये दरवर्षी २० टक्के वाढ होणे अपेक्षित धरले असता येत्या पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना ८ लाख कोटी रुपयांची गरज पडेल, असे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले. बेसेल-३ च्या भागभांडवलाची पूर्ती करण्यासाठी एवढ्या रकमेची आवश्यकता भासणार आहे. बॅँकांच्या धोक्यामध्ये २० टक्क्यांवरून १५ टक्के एवढी घट झाल्यास सुमारे ५ लाख कोटी रुपये लागतील, असे या अधिकार्‍यांनी सांगितले. या पाच लाख कोटी रुपयांपैकी दोन लाख कोटी रुपये हे टिअर-१ भांडवलाच्या पूर्तीसाठी लागणार आहेत. बॅँकांनी ही रक्कम जमा केल्यास उर्वरित रक्कम सरकारतर्फे दिली जाऊ शकते, असे दुसर्‍या एका अधिकार्‍याने स्पष्ट केले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांच्या अनुत्पादक मालमत्तांचे प्रमाण डिसेंबर २०१३ मध्ये ५.१७ टक्के होते. आधीच्या वर्षी ते ४.१८ टक्के होते. आर्थिक मंदीमुळे बॅँकांच्या अनुत्पादक मालमत्ता वाढत असाव्यात, असे मत व्यक्त होते. बॅँकांनी याबाबत त्वरित उपाययोजना करून अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सरकारी बॅँका आपल्या भागभांडवलापैकी काहीची विक्री करून पैसा उभारू शकतात. मात्र, असे करताना सरकारचा भागभांडवलातील वाटा ५१ टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक असते. ४बॅँका हक्काच्या समभागांची विक्री करून, तसेच समभागांची सार्वजनिक विक्री करू शकतात. त्याचप्रमाणे पात्र वित्तसंस्थांना समभागांची विक्री (क्यूआयपी) करूनही भांडवलाची उभारणी केली जाते.

देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेने या वर्षाच्या प्रारंभी केलेल्या समभाग विक्रीला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे बॅँकेला अपेक्षित असलेले ९,६०० कोटी रुपये जमा करता आले नाहीत. अनेक परकीय वित्तसंस्थांनी या क्यूआयपीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.