शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

घोषणांचा पाऊस, स्वप्नांची मालिका दाखविणारे सरकार

By admin | Updated: February 13, 2016 02:34 IST

बुलडाणा येथे विखे पाटील यांची भाजपा सरकारवर टीका.

बुलडाणा : भाजपाचे सरकार हे शेतकर्‍यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकर्‍यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्नांची मालिका दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ना. विखे पाटील शुक्रवारी बुलडाण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या सरकारच्या सर्व घोषणा या पोकळ आहेत. मंत्र्यांमध्ये वर्चस्व व नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. आधी घोषणा करायची, मग चिंतन करायचे, असा सर्व उरफाटा कारभार सुरू असल्याने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. पाणी टंचाईच्या झळा जोरात बसत असून, आमच्या सरकारने टँकरसाठी तहसील स्तरावर अधिकार दिले होते. आता या सरकारने विभागीय स्तरावर अधिकार दिल्याने टँकरच्या मंजुरीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत. सत्ताधार्‍यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, सध्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची त्यांनी भेट घेतली. या सरकारमध्ये शिवसेनेचे अस्तित्व जाणवत नसून, ते केवळ भाजपमागे फरफटत जात आहे. देशासमोर अनेक आव्हाने, संकटे उभी असताना सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या योजनेत गुंतून पडले आहेत. राज्य शासनाची दशाही सारखीच असून, भीषण दुष्काळ, टंचाई, नापिकी, शेतकरी आत्महत्या, मदत, पुनर्वसन या सर्वच पातळ्यांवर संवेदनहीन राज्य शासन अपयशी ठरले आहे. दुष्काळ निधी वाटपात कापूस उत्पादकांना वगळले व नंतर काल-परवा त्यांनाही मदत करू, अशी पोकळ घोषणा केली. दुष्काळी भागातील प्रामुख्याने मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणावर होणारे स्थलांतरण, मनरेगा व रोहयोची कामे सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य शासन कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.