शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सरकारी अनुदानित वसतिगृहातील मुलांना भरावे लागते अधिकचे शुल्क

By admin | Updated: July 12, 2017 01:58 IST

मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च - एप्रिल महिन्यात संपल्या. पण, मुंबई विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे अजूनही निकाल लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी अजूनही वसतिगृहात राहात आहेत. या विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. तरी, या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे. विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये अशी मागणी स्टुण्डट लॉ कौन्सिलतर्फे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ५ हजार ८७० रुपये तर, अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ८२० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी वसतिगृहात राहण्यासाठी दररोजचे १०० रुपये शुल्क भरावयाचे आहे. मुंबईबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी अनुदानित वसतिगृहांचा आधार असतो. विद्यार्थी वसतिगृहात राहिल्यास त्यांना महाविद्यालयात लेक्चरला जाणे, अभ्यास करणे सोपे जाते. तरी आता विद्यार्थ्यांना दररोज १०० रुपये शुल्क आकारणे योग्य नसल्याचे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असते तर विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता आले असते. आता ते शक्य नाही. निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे आवश्यक आहे. सरकारी आदेशानुसार, विद्यार्थ्यांकडून १०० रुपये आकारले जात आहेत. विद्यापीठाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे हेड सुप्रिटेण्डट एस.के. त्रिपाठी यांनी मात्र असा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही त्यांच्याकडे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या गुणपत्रिका मागवल्या आहेत.