शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारी अनुदानित वसतिगृहातील मुलांना भरावे लागते अधिकचे शुल्क

By admin | Updated: July 12, 2017 01:58 IST

मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च - एप्रिल महिन्यात संपल्या. पण, मुंबई विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे अजूनही निकाल लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी अजूनही वसतिगृहात राहात आहेत. या विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. तरी, या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे. विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये अशी मागणी स्टुण्डट लॉ कौन्सिलतर्फे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ५ हजार ८७० रुपये तर, अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ८२० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी वसतिगृहात राहण्यासाठी दररोजचे १०० रुपये शुल्क भरावयाचे आहे. मुंबईबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी अनुदानित वसतिगृहांचा आधार असतो. विद्यार्थी वसतिगृहात राहिल्यास त्यांना महाविद्यालयात लेक्चरला जाणे, अभ्यास करणे सोपे जाते. तरी आता विद्यार्थ्यांना दररोज १०० रुपये शुल्क आकारणे योग्य नसल्याचे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असते तर विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता आले असते. आता ते शक्य नाही. निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे आवश्यक आहे. सरकारी आदेशानुसार, विद्यार्थ्यांकडून १०० रुपये आकारले जात आहेत. विद्यापीठाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे हेड सुप्रिटेण्डट एस.के. त्रिपाठी यांनी मात्र असा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही त्यांच्याकडे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या गुणपत्रिका मागवल्या आहेत.