शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर, शिवसेना आमच्यासोबतच: गिरीश बापट

By admin | Updated: April 13, 2017 20:12 IST

‘राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर आहे. शिवसेना आमच्यासोबतच आहे. पाच वर्षे आमच्या ताकदीवर आमचे सरकार टिकेल

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 -  ‘राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर आहे. शिवसेना आमच्यासोबतच आहे. पाच वर्षे आमच्या ताकदीवर आमचे सरकार टिकेल, काँग्रेसच्या मेहरबानीवर नाही, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा पुढे करून संघर्ष यात्रा काढण्याचे नाटक केले जात आहे,’ असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 
 
 कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या आघाडी सरकारने जी पंधरा वर्षांत पापे केली, त्याचे धनी भाजपला केले जात असल्याची टीका करून मंत्री बापट म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे लाट क्षणिक असल्याचे सांगत होते. ती येते आणि जाते, असेही म्हणत होते. पण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. हे त्यांनी विसरू नये.’
 
‘आघाडी शासनाच्या काळात शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली होती. तेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. शेतकºयांच्या प्रश्नाचं राजकारण करून भाजपवर वार करणाºयांचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे आपल्या हातात काहीच राहिले नाही, हे ओळखून संघर्ष यात्रेचे नाटक केले आहे. शेतकºयांना कायमस्वरुपी उभे करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,’ असेही मंत्री बापट यांनी सांगितले.
 
दरम्यान, ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ३७ वा वर्धापन दिन झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सर्वत्र जाऊन पक्षविस्ताराचे काम हाती घेणार आहे. सातारा जिल्ह्यातून ३०० विस्तारक जिल्ह्याबाहेर जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. 
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष सुनील काळेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, मिलिंद काकडे, सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.