शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात : तटकरे

By admin | Updated: September 20, 2016 19:20 IST

मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २० : मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे. मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे, असे व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे पंढरपूर येथे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी सकाळी येथे आले होते. या वेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे तटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोध आजपर्यंत विरोध करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी करण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेंव्हा ते कराडला निघून गेले होते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची यादी आम्ही नाईलाजाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. आता मात्र आघाडी तोडल्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जाते हे चुकीचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ राष्ट्रवादीला विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका तटकरे यांनी केली

अच्छे दिन कुठे गेले राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते पंढरपूर मध्ये बोलत होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहे. सरकारचा धाक कमी झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ह्यअच्छे दिन कुठे गेलेह्ण असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

चव्हाणांना तटकरेंचा टोलाकॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केले होते. या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि , मागे एकदा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी लागली असती या मध्ये आमचा पक्ष संपला असता असे वक्तव्य केले होते. याची आठवण त्यांनी ठेवावी असा टोला तटकरे यांनी चव्हाण यांना लगावला.

आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरुविधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नियोजन विस्कळीत झाले होते. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही धोरण ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानरगापलिका, नगरपालिका निवडणुकीच काम सुरु आहे