शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात : तटकरे

By admin | Updated: September 20, 2016 19:20 IST

मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २० : मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे. मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे, असे व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे पंढरपूर येथे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी सकाळी येथे आले होते. या वेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे तटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोध आजपर्यंत विरोध करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी करण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेंव्हा ते कराडला निघून गेले होते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची यादी आम्ही नाईलाजाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. आता मात्र आघाडी तोडल्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जाते हे चुकीचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ राष्ट्रवादीला विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका तटकरे यांनी केली

अच्छे दिन कुठे गेले राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते पंढरपूर मध्ये बोलत होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहे. सरकारचा धाक कमी झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ह्यअच्छे दिन कुठे गेलेह्ण असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

चव्हाणांना तटकरेंचा टोलाकॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केले होते. या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि , मागे एकदा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी लागली असती या मध्ये आमचा पक्ष संपला असता असे वक्तव्य केले होते. याची आठवण त्यांनी ठेवावी असा टोला तटकरे यांनी चव्हाण यांना लगावला.

आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरुविधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नियोजन विस्कळीत झाले होते. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही धोरण ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानरगापलिका, नगरपालिका निवडणुकीच काम सुरु आहे