शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात : तटकरे

By admin | Updated: September 20, 2016 19:20 IST

मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २० : मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे. मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे, असे व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे पंढरपूर येथे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी सकाळी येथे आले होते. या वेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे तटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोध आजपर्यंत विरोध करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी करण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेंव्हा ते कराडला निघून गेले होते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची यादी आम्ही नाईलाजाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. आता मात्र आघाडी तोडल्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जाते हे चुकीचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ राष्ट्रवादीला विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका तटकरे यांनी केली

अच्छे दिन कुठे गेले राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते पंढरपूर मध्ये बोलत होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहे. सरकारचा धाक कमी झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ह्यअच्छे दिन कुठे गेलेह्ण असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

चव्हाणांना तटकरेंचा टोलाकॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केले होते. या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि , मागे एकदा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी लागली असती या मध्ये आमचा पक्ष संपला असता असे वक्तव्य केले होते. याची आठवण त्यांनी ठेवावी असा टोला तटकरे यांनी चव्हाण यांना लगावला.

आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरुविधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नियोजन विस्कळीत झाले होते. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही धोरण ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानरगापलिका, नगरपालिका निवडणुकीच काम सुरु आहे