शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

गायींची जबाबदारी शासनाने घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 00:17 IST

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर येथील गायींचे संगोपन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा घरचा आहेर केंद्रीय महिला

पुणे : महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर येथील गायींचे संगोपन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा घरचा आहेर केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शनिवारी राज्यातील भाजपा सरकारला दिला. प्राण्यांच्या पालन पोषणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी पीपल फॉर अ‍ॅनिमल (पीएफए) संस्थेतर्फे पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गोशाळा स्थापन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पशुधन कल्याण मंडळाकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्र शासनाने गोशाला स्थापन कराव्यात याबाबत मी पाठपुरावा करत आहे. गावातील गायरानांची संख्या कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचे पालन करणे शक्य होत नाही, असे त्या म्हणाल्या. आॅक्सिटोसिनला मी नेहमी विरोध केला. मात्र, सुमारे तीन वर्षांपासून ठाण्यात एका खासगी कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या आॅक्सिटोसिन या घातक औषधामुळे गाई, म्हशींवर वाईट परिणाम झाले आहेत. आॅक्सिटोसिन गायींच्या दुधातून मानवाच्या शरीरात जाते. केंद्र शासनानेही याबाबत आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.साहित्य, अभिनय आदी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला शासनाने पुरस्कार द्यावा, अशी मागणी समाजातील विविध क्षेत्रातून केली जाते. त्यामुळे हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार परत करणे म्हणजे देशाचा अपमान आहे, असे मत मनेका गांधी यांनी व्यक्त केले. हे सर्व पुरस्कार आमच्या सरकारने दिलेले नाहीत. काँग्रेसच्या काळात पुरस्कार देण्यात आले असून, त्यांनाच परत करावेत, असेही त्या म्हणाल्या.