शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी शासनाने वटहुकूम काढावा

By admin | Updated: July 5, 2015 02:08 IST

सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मागणीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे. ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे फडणवीस सरकार न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की मंडळांचे मन राखण्यासाठी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मंडळांना पाठिंंबा देत शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवादरम्यान विविध परवान्यांसाठी महापालिकेचे आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यावर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता दादरमधील शिवसेनाभवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खंत व्यक्त केली. राज्यात पूर्वीच्या युती सरकारने वटहुकूम काढत सार्वजनिक मंडळांना दिलासा दिला होता. ही बाब समितीने उद्धव यांच्या लक्षात आणून दिली. यावर गणेशोत्सवादरम्यान वटहुकूम काढण्यात यावा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसे आश्वासनच त्यांनी समितीला दिले आहे. (प्रतिनिधी)मुंबईतील गणपती, नवरात्र आणि दहीकाला उत्सव साजरे करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत भाजपाने महामंत्री सुनील राणे, आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक जनाधिकार समिती गठित केली आहे. या समितीच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावर ९ जुलै रोजी सुनावणी होईल.