शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

शासनाने शंभर टक्के निधी द्यावा

By admin | Updated: July 4, 2015 00:49 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखडा : जिल्हाधिकारी करणार निधीची मागणी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी देवस्थान समितीलाही २५ टक्के निधी द्यावा लागणार आहे. मात्र, राज्यातील अन्य देवस्थानांप्रमाणे शासनाने अंबाबाई मंदिराच्याही विकासासाठी शंभर टक्के निधी द्यावा, अशी विनंती देवस्थान समितीकडून करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांपासून अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर काम सुरू असतानाही महापालिकेने कधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विचारात घेतले नाही. एवढेच काय बऱ्याच सदस्यांना आराखडा कसा आहे हेही माहीत नव्हते. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी महापालिकेचे अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना विकास आराखड्याची माहिती देण्यास सांगितले. या सादरीकरणानंतर देवस्थानने अधिकृतरित्या विकास आराखड्याला मंजुरी दिली तसेच मंदिराच्या परिसरात जी काही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘एनओसी’देखील देण्याचा निर्णय झाला. अंबाबाई मंदिरचा सुधारित विकास आराखडा २२५ कोटींचा आहे. त्यातील ५० टक्के रक्कम शासनाने, २५ टक्के महापालिकेने व २५ टक्के रक्कम देवस्थान समितीने द्यावी, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीलाही जवळपास ५०-५२ कोटींच्या आसपास रक्कम द्यावी लागणार आहे. सद्य:स्थितीत देवस्थानकडे तेवढी रक्कम नाही आणि ती दिली तर तिजोरीत खडखडाट होईल शिवाय शासनाने नाशिक, नांदेड, तुळजापूर, शिर्डीसारख्या देवस्थानांना शंभर टक्के निधी दिलेला असताना अंबाबाई मंदिरालाही तो द्यायला काहीच हरकत नाही, असा विचार या बैठकीत मांडण्यात आला. अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे मंदिर विकासासाठीचा शंभर टक्के निधी शासनाने द्यावा, अशी मागणी करणार आहेत. मूर्ती संवर्धनासाठी होणार संयुक्त बैठकअंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या केमिकल कॉन्झर्वेशनच्या नियोजनासाठी देवस्थान समिती, श्रीपूजक आणि पुरातत्व खाते यांची संयुक्त बैठक होणार आहे. अंबाबाई मूर्तीवर केमिकल कॉन्झर्वेशन करण्यासाठी मूर्तीतील देवत्व काढून घेणाऱ्या तत्वचालनसारखे अनेक महत्त्वाचे धार्मिक विधी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे सगळे विधी योग्य त्या मुहूर्तावरच होणे गरजेचे असून २६ ऐवजी २२ जुलै हा दिवस त्यासाठी योग्य आहे, असे श्रीपूजकांचे म्हणणे आहे. मूर्तीवर रात्रीच्यावेळी रासायनिक प्रक्रिया करणे संयुक्तिक नाही शिवाय ते सुरू असताना मूर्तीची सालंकृत पूजा बांधता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळे धार्मिक संस्कार हे उत्सवमूर्तीवरच करावे लागणार आहेत. या सगळ््या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक होणे अत्यंत गरजेचे आहे तसे पत्रही श्रीपूजक मंडळाने देवस्थान समितीला देण्यात आले आहे शिवाय गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी पुरातत्व खात्याचे संचालक व्ही. एन. कांबळे यांना आपल्याला सगळ््यांना सोबत घेऊन काम करायचे आहे त्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करा, असे सांगितले आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत ही बैठक होणार आहे. तुळजाभवानी, शिर्डीसारख्या मंदिरांइतकेच अंबाबाई मंदिरही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्य देवस्थानांप्रमाणे शासनाने या देवस्थानलाही शंभर टक्के निधी द्यावा, अशी आम्ही मागणी करणार आहोत. - डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी