शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

दिल्लीचंं नव्हे, मुंबईतलं सरकार हवं !

By admin | Updated: October 10, 2014 22:50 IST

कुडाळ : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारसभेत अजित पवारांचा ‘कॉँग्रेस-भाजप’वर निशाणा

कुडाळ : ‘जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपला सत्ता दिली. तरीही त्यांना महागाई कमी झाली नाही. कांदा आणि उसाला चांगला भाव त्यांना देता आलेला नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मारक आहे. काँॅग्रेस आणि भाजपवाले दिल्लीत बसून महाराष्ट्राचे निर्णय घेतात. आम्ही मात्र, सातारा अथवा मुंबईमध्येच बसून राज्याचे निर्णय घेतो. म्हणूनच राज्यात मुंबईचं सरकार आणा,’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘सातारा-जावळी’ चे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कुडाळ येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. कुडाळ येथील सभेस शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शिक्षण सभापती अमित कदम, पंचायत समिती सभापती सुहास गिरी, वसंत मानकुमरे व सुनेत्रा शिंदे आदी उपस्थित होते.पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत अजित पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीच्या माहितीवर काही तरी बोलत आहेत. बारामतीमध्ये पाणी नसते तर लोकांनी आम्हाला निवडून दिले असते का? महाराष्ट्र नेहमीच गुजरातपेक्षा पुढे राहिला आहे. देशातील पहिली मोनोरेल महाराष्ट्राने सुरू केली आहे. एवढे असतानादेखील भाजप मात्र ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. आता आम्ही महाराष्ट्राची अशाप्रकारे सुरू असलेली बदनामी कधीच सहन करणार नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदीच शेतकऱ्यांसाठी मारक आहेत.’अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘चीनची घुसखोरी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात येथे चीन अध्यक्षांसोबत झोपाळ्यावर बसून अगदी झुलत चहा पीत होते. आता तर भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानचे हल्ले सुरू असताना मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे आता देशातील १२५ कोटी जनतेने कोणाच्या विश्वासावर सुरक्षित राहायचे,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.‘जिल्हा परिषद निवडणुकीत अपघाताने निवडून आलेल्या संधीसाधूंना तालुक्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील,’ अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. शशिकांत शिंदे यांनीही भाषण केले. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, पंचायत समिती सदस्य मोहन शिंदे, रूपाली वारागडे, जितेंद्र शिंदे, सौरभ शिंदे, मालोजी शिंदे, संगीता चव्हाण, सारिका सकपाळ, कविता धनावडे, जयदीप शिंदे, कांचन साळुंखे, चंद्रकांत जाधव, प्रवीण देशमाने, वसंत मानकुमरे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शेडगे यांनी प्रास्ताविक केले. अमित कदम यांनी आभार मानले.राष्ट्रवादीच्या सभामंचकावर ‘रिपाइं’चे पदाधिकारीराष्ट्रवादीचे ‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या अजित पवारांच्या सभामंचकावर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार जातीयवादी असल्याचा आरोप करत ‘रिपाइं’चे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी विधानसभेला राष्ट्रवादीबरोबर राहणार असल्याची घोषणा केली.