शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: May 31, 2015 01:52 IST

मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी,

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी, खरिपाच्या पेरणीसाठी तसेच व्याजातही सवलत द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी केली़ अन्यथा शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला़ शरद पवार हे तीन दिवस मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून, शनिवारी औरंगाबाद जिल्ह्णातील चित्ते पिंपळगाव येथून या दौऱ्याची सुरुवात झाली़ त्यांनी जालना जिल्ह्णाच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी व अंबड तालुक्यातील जामखेड या दुष्काळी गावांचा दौरा केला़ पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या़ पवार म्हणाले, टंचाई परिस्थिती आवाक्यात असेल, तर शेतकरी स्वत:च काहीतरी मार्ग काढत असतो. मात्र, यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी़ मागील सरकारच्या काळात आपण केंद्रात कृषिमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटकाळात तातडीने मदत केली. आताचे सरकार शहरी भागाचे आहे. मला सरकारमधील एक माणूस भेटला. तो म्हणतो की, आम्हाला शहरातील मतदारांनी निवडून दिले आहे. शहरी भागात महागाई वाढू नये, असे प्रयत्न असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या सरकारविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.नवा गडी पाहामागच्या दुष्काळाच्या वेळी आम्ही शेतकऱ्यांना खूप मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली किंमत दिली. तरीही नंतर तुम्ही ‘नवा गडी’ निवडला. आता नवा गडी कशी मदत करतो त्याची वाट पाहा. आता तुम्ही त्याची वाट पाहता की तो तुमची वाट पाहतोय ते मला नाही माहीत, असे सांगत पवार यांनी सरकारला मिश्कील चिमटा घेतला.