शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार

By admin | Updated: May 28, 2017 22:45 IST

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 28 - सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  ते म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करावी, मतभेद विसरून एकत्र यावे, तर शेतक-याला न्याय मिळेल, बळीराजाचे हित जपण्यासाठी जागे राहिले पाहिजे. एकतर शेतमालाला किंमत द्या नाही तर कर्जमाफी द्या, महाराष्ट्राचा अन् देशाचा बळीराजा उद्ध्वस्त झाला तर देश मजबूत होणार नाही, शेतकरी हे राज्य अन् देश चालवत आला आहे, असंही पवार म्हणाले आहेत.महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या नेतृत्वाचे स्वप्न बघितले नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श माझ्यासमोर होता. त्यांच्या उद्याच्या महाराष्ट्राची भूमिका मला भावली. महाराष्ट्राने मला भरभरून दिले, मात्र त्यातही नाशिककरांचा मोठा वाटा आहे. देशाच्या संसदेत महाराष्ट्राची संख्या वाढू शकलो नाही, हे मान्य करतो.  वास्तवतेचे भान ठेवून राजकीय वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच पाय जमिनीवर ठेवणे पसंत केले. सोन्याच्या साखळ्या अन् अंगठ्या घालणाऱ्या पुढा-यांपासून मी नेहमीच लांब राहतो. मुंबईचे डबेवाले हे जास्त करून नाशिकचे, हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसं माझी आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो.

खेळाडू आणि त्यांच्या सुविधा ही माझी जबाबदारी मी मानली. मुंबई क्रिकेट क्लबला कर्जमुक्त करून मी पद सोडले. ब्रॅडमन यांच्या विक्रमापेक्षा भाऊसाहेब निंबाळकर यांनी केवळ तीन धावा कमी काढल्या. त्यांना 50 हजार रुपये पेन्शन सुरू केली. जुन्या खेळाडूंना प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला. भारतीय क्रिकेट क्लबने 50 कोटी भारतीय खेळांच्या विकासासाठी खेळ मंत्रालयाकडे दिले. लातूरचा भूकंप हा मोठा धक्का, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, झोप सोडली, पहाटे निघालो, सकाळी किल्लारी लातूरला गाठले, अंत्यसंस्कार अडचणीत आले, मुसळधार पाऊस सुरू झाला होता, तो काळ मोठा आव्हानात्मक होता. त्यावेळी पाच हजार माणसे त्या जिल्ह्यात मृत्युमुखी पडली होती. ते आठवले तरी अंगावर शहारा येतो. मुख्यमंत्री असताना 1993 साली एअर इंडियाच्या इमारतीत बॉम्ब फुटला. त्यावेळी मी तेथे पोहोचलो, आरडीएक्स देशात पुण्याच्या खडकीमध्ये तयार होते, आरडीएक्स कराचीतून आल्याचे लक्षात आले, त्यावेळी 12 ठिकाणी बॉम्ब पडले असे सांगितले. 12वे ठिकाण मुहम्मदअली रोडचे होते, दंगल टळली, 11 ठिकाणी बॉम्ब पडले होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येत नाही हा आपला पराभव आहे असे मानले, तीन वर्षांनंतर मी आंबेडकर यांचे नाव दिले, असंही पवार यांनी सांगितलं आहे.