शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ग्रामीण भागातील ६० कोटींच्या विकासकामांना सरकारची कात्री

By admin | Updated: February 14, 2015 04:13 IST

आर्थिक डोलारा कोलमडल्याने डबघाईस आलेल्या राज्य सरकारने विविध विकासकामांच्या निधीत ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असताना

नारायण जाधव, ठाणेआर्थिक डोलारा कोलमडल्याने डबघाईस आलेल्या राज्य सरकारने विविध विकासकामांच्या निधीत ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असताना त्याचा सर्वात मोठा पहिला फटका ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांना बसला आहे़ ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ६० कोटींच्या कामांना निधी देण्यास वित्त खात्याने असमर्थता दर्शविल्याने ग्रामीण विकास खात्याने ही कामेच बुधवारी रद्द केली आहेत़ यामध्ये रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांचा समावेश आहे़ लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव राज्य सरकारने ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ही विकासकामे करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रशासकीय मान्यता दिली होती़ तर डिसेंबर २०१४ च्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यासाठी ६० कोटींच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता़ यानुसार, जिल्हा परिषदांना निधी देऊन त्यांनी या विकासकामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करून ठेवावी, असे नमूद करून त्यानुसार कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले होते़ मात्र, हा निधी देण्यास वित्त खात्याने असमर्थता दर्शविल्याने लोकप्रतिनिधींनी सुचविलेली सर्व ६० कोटींची रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांची कामे रद्द करणे ग्रामविकास खात्यास भाग पडले आहे़एकीकडे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सांसद ग्रामविकास योजना सुरू केल्यानंतर राज्यातही आमदार ग्रामयोजना सुरू करण्याचा मानस मराठवाड्याच्या नेत्या तथा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलून दाखविला होता़ मात्र, आता राज्याच्या आर्थिक डबघाईचे कारण पुढे करून ग्रामीण लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ६० कोटींच्या विकासकामांना निधी देण्यास असमर्थता दाखवून वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपला वैदर्भीय हिसका दाखविला आहे़