शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

सरकार ‘संघ दक्ष’; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही!

By admin | Updated: January 10, 2016 01:06 IST

पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून

मुंबई : पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून येत नाही. हे सरकार ‘संघ दक्ष’ आहे; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, भाई जगताप आणि सतेज पाटील यांचा टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्र मात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणकिराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.बिहार, मध्य प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकींचे निकाल भाजपसाठी प्रतिकूल आहेत. दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे जनतेत भाजपविरोधी वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ घ्यायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन या सरकारची वस्तुस्थिती लोकांसमोर उघड करा. मागील वर्षभरात महाराष्ट्र कसा अधोगतीकडे गेला, हे लोकांच्या निदर्शनास आणून द्या. ही जबाबदारी व्यविस्थतपणे पार पाडली तर ‘अच्छे दिन’ आणण्याचे खरी ताकद भाजपमध्ये नव्हे तर काँग्रेसमध्येच असल्याची जनभावना निर्माण होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)परंतु काँग्रेस पक्ष आक्र मकपणे सरकारविरूद्ध संघर्ष करीत राहील. तीनही सत्कारमूर्ती अमरीश पटेल, भाई जगताप व सतेज पाटील यांनी देखील सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे संचालन प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी केले.