शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार-नीतेश राणे

By admin | Updated: August 2, 2016 05:34 IST

३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी ३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी समाज भावनांचा उद्रेक झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.राणे म्हणाले, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसताना सुरक्षाही देऊ शकत नाही. परिणामी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाने कायदा हाती घेतल्यास त्यास सरकार सर्वस्वी जबाबदार असेल. ३ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. राजकारण बाजूला ठेवत मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सुमारे ३५ हून अधिक संघटना या मोर्चात सामील होणार होत्या.मोर्चा काढण्यास सरकारने परवानगी दिलेली नसली, तरी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले. तर इतर संघटना आणि कार्यकर्ते विधानसभेबाहेर आवाज उठतील, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)