शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडण्यास सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 05:08 IST

आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.

मुंबई : दादर येथील आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. दादर येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी झालेल्या भाषणात जयदेव गायकवाड, जनार्दन चांदूरकर, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कपिल पाटील, हरिभाऊ राठोड आदी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच आंबेडकर भवन पाडण्यात आली. तसेच ही इमारत धोकादायक ठरविणारी मुंबई महापालिकाही तितकीच जबाबदार असल्याचे गायकवाड म्हणाले. तर, आंबेडकर भवन ऐतिहासिक वास्तू होती. तिथे मुकनायक, प्रबुद्ध भारत आदी वृत्तपत्रे छापली जात. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशी ऐतिहासिक वास्तू पाडता येत नाही. राज्याचे माजी मुख्यसचिव आणि सध्याचे माहिती लोकायुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या पाठीमागे अदृश्य राजकीय शक्त कार्यरत आहे. त्यामुळे आंबेडकर भवन पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप चांदूरकर यांनी केला. या प्रश्नावरुन आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहाचे नियमित कामकाज बाजूला सारुन या विषयावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मंगळवारच्या दिवसभराच्या कामकाजात याच विषयावरील लक्षवेधी सूचना मांडण्यात आली असल्याचे सांगत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारला. (प्रतिनिधी)>आंबेडकर भवनप्रकरणी चौकशीचे निर्देशडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे उभारलेले भवन धोकादायक ठरवून ते पाडण्याची परवानगी कोणी दिली, नव्या इमारतीचा आरखडा कोणी मंजूर केला आणि इंटेनशन फॉर डेव्हलपमेंटला परवानगी कशी मिळाली, याची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले. विधानसभेत हा विषय बळीराम शिरसकर यांनी अनोख्या पध्दतीने उपस्थित केला. तर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आणि आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले. शेलार म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या सर्व वास्तुंचे जनतच झाले पाहिजे अशीच भूमिका सरकार आणि भाजपाची आहे. दादर येथील या पवित्र वास्तूलाही ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित करून महापालिकेने जतन करण्याची गरज होती. पण संपूर्ण वास्तुला ३५४ ची नोटीस बजावून ती धोकादायक इमारतीच्या सी १ दर्जामध्ये टाकण्यात आली. तसेच नव्या इमातीचा आराखडा मंजूर करण्यात आला.