शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

सरकारचा रीमोट माझ्याच हाती !

By admin | Updated: January 24, 2016 02:46 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट माझ्या हातात दिला. त्यामुळे युती सरकार चालवण्याचा रीमोट कंट्रोल माझ्या हातात आहे आणि सरकार चालविण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेला लगावला. काहीही झाले तरी महाराष्ट्रात कामाच्या जोरावर ‘शिवशाही’च पाच वर्षे कायम दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आठ योजनांची सुरुवात शनिवारी रीमोटद्वारे करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खा. अनिल देसाई, अरविंद सावंत, एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनीअसून, शेवटपर्यंत वाट पाहणाऱ्या माणसालाही एसटीचा आधार वाटतो, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, २४ तास तुम्ही महाराष्ट्राला सेवा देता हे कोणी विसरू शकत नाही.तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की,बऱ्याच वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद पाहायला मिळत आहे. सरकार बदलले ही चुणूक तुमच्यामुळेच दिसून आली. एसटीचे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, त्याची कोणी दखल घेतली नाही. आधीच्या सरकारने तर अजिबात घेतली नाही. त्यामुळे आताच्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. यावेळी त्यांनी शिवशाही बस सेवेचा उल्लेख करत बसवर फडकलेला भगवा गावोगावी पोहोचविण्याचे आवाहन केले. महामंडळाच्या योजना तर लोकाभिमुख आहेतच. पण प्रत्यक्षात कामच बोलत असल्याने आपल्याला अधिक बोलण्याची गरज लागत नाही, असे ते म्हणाले. पै-पैचा वापर...एसटी कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसाच्या वेतनाची एकूण ६ कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपये एवढी रक्कम दुष्काळनिधीसाठी देण्यात आली. तुम्ही दिलेली पै आणि पै शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली जाईल, असा विश्वास त्यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना दिला.शिवशाहीवरून कोपरखळी...शिवशाही बससेवेचा उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारी काम हे पूर्वी ठोकळ्यासारखे होते. आता तसे राहिले नाही. हे शिवशाही बसमधूनच दिसून आले. आपण शिवशाहीत प्रवेश करतोय हे बसमध्ये प्रवेश करताच समजते.’