शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

गोविंदांसाठी सरकारची पुनर्विचाराची ‘हंडी’

By admin | Updated: August 14, 2014 10:24 IST

दहीहंडी उत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांची माहिती : उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका करणारमुंबई : दहीहंडी उत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, दहीहंडीची उंची तसेच बालगोविंदांच्या सहभागाबात नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र याबाबत नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्या इतपत अवधी नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.दहीहंडी उत्सवातील अपघात आणि लहान बालकांच्या जीविताला असणारा धोक लक्षात घेत न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदांवर बंदी घातली. तसेच दहीहंडीच्या उंचीवर २० फुटापर्यंतची मर्यादा घातल्याने गोविंदा पथके, दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने याप्रश्नी तोडगा काढावा अन्यथा कोणत्याही परिस्थितीत दहीहंडीची परंपरा पाळू. आयोजक जेवढ्या उंचीवर हंडी बांधतील तेवढे थर लावण्यात येतील, असा इशारा दहीहंडी सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने दिला होता. (प्रतिनिधी)

निर्बंध लावणे अवघडदहीहंडीसारख्या धार्मिक उत्सवावर निर्बंध लादणे अवघड असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. मात्र गोविंदा पथकांनी १२ वर्षांखालील मुलांचा आपल्या पथकात समावेश करू नये, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी या वेळी केले.