शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वीज सुविधांचा ६५ करोडचा प्रस्ताव शासनदरबारी सादर!

By admin | Updated: July 21, 2016 18:06 IST

सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला.

सुनील काकडे

वाशिम : सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला. त्यास मुंबईच्या ह्यडिस्ट्रीब्युशनह्ण विभागाने मंजूरात देवून अंतीम निर्णय आणि निधीसाठी शासनदरबारी हा प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, निधी प्राप्त होताच अकराही बॅरेजेसस्थळी विजेच्या सुविधा उभ्या केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक अभियंता बी.आर.बनसोडे यांनी गुरूवार, २१ जुलै रोजी दिली.जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर तब्बल ७१६.४२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अकराही बॅरेजेसची कामे सद्या पूर्ण झाली असून त्यात मोठा जलसाठा देखील निर्माण झाला आहे. या प्रकल्पांमुळे वरूड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळी, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर या पैनगंगा नदीकाठच्या गावांमधील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना खरिप, रबी हंगामासह उन्हाळी पिकांकरिता देखील पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.

तथापि, एकीकडे सिंचनाच्या बाबतीत आशादायक वातावरण निर्मिती झाली असताना दुसरीकडे मात्र प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवलेल्या विजेच्या समस्या वाढतच चालल्या होत्या. पाणी उपलब्ध असले तरी त्याचा वापर सिंचनाकरिता करायचा झाल्यास कृषीपंपांना पुरेशी वीज मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगाने अकराही प्रकल्पक्षेत्रात वीज उपकेंद्र उभारून ठिकठिकाणी रोहित्रांची उपलब्धी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

तद्वतच हा प्रश्न निकाली निघावा, यासाठी ह्यलोकमतह्णनेही वेळोवेळी सकारात्मक लिखान केले. त्याची दखल घेत महावितरणने बॅरेजेस प्रकल्प परिसरात विजेच्या भौतिक सुविधा उभ्या करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या ह्यडिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटह्णकडे पाठविला.  तेथून या प्रस्तावाला ह्यहिरवी झेंडीह्ण मिळाली असून आता शासनाच्या अंतीम मंजूरीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. तथापि, जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदारांनी शासनाकडून हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून अपेक्षित निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.