शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक!

By admin | Updated: February 5, 2015 02:21 IST

पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’ची छापमुंबई : पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. तथापि, पत्रकार सुरक्षा कायद्याच्या तरतुदींविषयी सरकारमध्ये दुमत असल्याचेही त्यांनी सांगितले.शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात लोकमतच्या विविध आवृत्त्यांमधील १२ पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे या समारंभावर लोकमतची छाप होती. ई-माध्यमांनी सरकारपुढे अनेक प्रश्न उभे केले आहेत. त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ही माध्यमेदेखील मुख्य प्रवाहात कशी येतील व त्यावर नियंत्रण कसे येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. माध्यमांनी लोकशाहीवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. माध्यमांचे महत्त्व आपल्याला नक्कीच आहे; मात्र त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले. सामाजिक मूल्यांची जपणूक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पत्रकारिता करताना नैतिक बळ प्राप्त होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि हे आत्मचिंतन आम्ही आमच्यापासून सुरू करणेही गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.या वेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, लोकमतचे माजी मुख्य संपादक विजय कुवळेकर आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. शाल, श्रीफळ आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तीन वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले आहेत, याचा अर्थ शासन गतिमान होत आहे, असा निघू शकतो, असे खुमासदार शैलीत सांगत दिनकर रायकर म्हणाले, पत्रकारांनी आपण ज्या राज्यात राहतो, त्या भागाचे हित लक्षात घेऊन बातमीदारी केली पाहिजे. जीवनगौरव पुरस्कार हा उर्वरित आयुष्यात काही तरी गौरवपर करण्यासाठी दिला आहे, असे मानत असल्याचे विजय कुवळेकर म्हणाले.तत्पूर्वी माहिती खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तर महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी मनीषा म्हैसकर यांचे आणि संचालक शिवाजी मानकर यांनी चंद्रशेखर ओक यांचे स्वागत केले. मानकर यांनी आभार मानले.मुख्यमंत्र्यांनी काढला चिमटासरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असे आपण काही महिन्यांपूर्वी सतत बोलत होतो. पण मागच्या सरकारने वेळीच निर्णय घेतले असते तर आज आपल्याला तीन वर्षांच्या ४५ विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले नसते, असा जोरदार चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.पुरस्कार विजेते लोकमत समाचार; जळगावचे मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार, लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म. परांजपे पुरस्कार, लोकमत अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील यांना परुळेकर पुरस्कार.