शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार एक पक्षकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 04:56 IST

न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.

-  अॅड. नितीन देशपांडे न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.ज्या खटल्यांमध्ये साक्षीपुरावे घेऊन आपले गाºहाणे सिद्ध करावे लागते, अशा खटल्यात उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येत नाही. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. दिवाणी दंड सहितेत १८७०पासून कलम ८०ची योजना करण्यात आली. त्यानुसार नागरिकांना सरकारविरुद्ध दावा करण्यापूर्वी सरकारला आपण काय दावा दाखल करणार आहोत याची पूर्व नोटीस देणे आवश्यक केले. त्याचा हेतू असा आहे की नागरिकांचे गाºहाणे सरकार समजावून घेईल आणि जर त्यात तथ्य आढळले तर प्रस्तावित वादीचे गाºहाणे दूर करील. अशाने न्यायालयीन खटले निदान सरकारपुरते तरी कमी होतील.पण विधि आयोगाच्या १२६व्या रिपोर्टनुसार कलम ८० खाली नोटीस दिल्यास सरकारी अधिकारी घाईने पावले उचलून वादीच्या गाºहाण्यावर पाणी कसे पडेल असे बघत. म्हणून अशी नोटीस न देता दावा दाखल करून मनाईचा हुकू म घेऊन मगच नोटीस देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. या कलमाच्या घटनात्मक वैधतेला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दिलेले आव्हान फेटाळले गेले.या कलमाच्या मूळ हेतूलाच सरकार पक्षाकडून काळे फासले गेलेले आहे. एकदा कलम ८०ची नोटीस दिलेली व्यक्ती मृत झाली. तिच्या मुलाबाळांनी लावलेल्या दाव्यावर सरकारने तांत्रिक हरकत घेतली. यावर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सदरहू नोटिसीवर दाखल केलेला दावा योग्य ठरवला. कलम ८०च्या नोटिसीवर ढिम्म राहून सरकार पक्षानेच न्यायालयीन प्रकरणाच्या संख्येवर आळा घालण्याची संधी घालवली आणि ती एक औपचारिकता बनली. नागरिक ांनी कायदे पाळावेत असा आग्रह धरणारे सरकार अशा नोटिसीवर कोणतीच कारवाई न करून स्वत: कायदे तोडते. म्हणून विधि आयोगाने आपल्या १४व्या अहवालात हे कलमच रद्द करण्याची शिफारस केली. त्याची दखलही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. त्यानंतर आपल्या २७व्या अहवालात पण आयोगाने हेच मत व्यक्त केले. पण संसदेच्या संयुक्त समितीने ही शिफारस अमान्य केली. यामुळे जगात कोठेही नसणारे हे बंधन कारणाशिवाय तसेच चालू आहे. या नोटिसीमुळे सरकार खटले टाळण्यासाठी काहीही करत नाही. मग खटल्यांची संख्या वाढली तर दोष कुणाचा?

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या