शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

सरकार एक पक्षकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 04:56 IST

न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.

-  अॅड. नितीन देशपांडे न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.ज्या खटल्यांमध्ये साक्षीपुरावे घेऊन आपले गाºहाणे सिद्ध करावे लागते, अशा खटल्यात उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येत नाही. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. दिवाणी दंड सहितेत १८७०पासून कलम ८०ची योजना करण्यात आली. त्यानुसार नागरिकांना सरकारविरुद्ध दावा करण्यापूर्वी सरकारला आपण काय दावा दाखल करणार आहोत याची पूर्व नोटीस देणे आवश्यक केले. त्याचा हेतू असा आहे की नागरिकांचे गाºहाणे सरकार समजावून घेईल आणि जर त्यात तथ्य आढळले तर प्रस्तावित वादीचे गाºहाणे दूर करील. अशाने न्यायालयीन खटले निदान सरकारपुरते तरी कमी होतील.पण विधि आयोगाच्या १२६व्या रिपोर्टनुसार कलम ८० खाली नोटीस दिल्यास सरकारी अधिकारी घाईने पावले उचलून वादीच्या गाºहाण्यावर पाणी कसे पडेल असे बघत. म्हणून अशी नोटीस न देता दावा दाखल करून मनाईचा हुकू म घेऊन मगच नोटीस देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. या कलमाच्या घटनात्मक वैधतेला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दिलेले आव्हान फेटाळले गेले.या कलमाच्या मूळ हेतूलाच सरकार पक्षाकडून काळे फासले गेलेले आहे. एकदा कलम ८०ची नोटीस दिलेली व्यक्ती मृत झाली. तिच्या मुलाबाळांनी लावलेल्या दाव्यावर सरकारने तांत्रिक हरकत घेतली. यावर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सदरहू नोटिसीवर दाखल केलेला दावा योग्य ठरवला. कलम ८०च्या नोटिसीवर ढिम्म राहून सरकार पक्षानेच न्यायालयीन प्रकरणाच्या संख्येवर आळा घालण्याची संधी घालवली आणि ती एक औपचारिकता बनली. नागरिक ांनी कायदे पाळावेत असा आग्रह धरणारे सरकार अशा नोटिसीवर कोणतीच कारवाई न करून स्वत: कायदे तोडते. म्हणून विधि आयोगाने आपल्या १४व्या अहवालात हे कलमच रद्द करण्याची शिफारस केली. त्याची दखलही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. त्यानंतर आपल्या २७व्या अहवालात पण आयोगाने हेच मत व्यक्त केले. पण संसदेच्या संयुक्त समितीने ही शिफारस अमान्य केली. यामुळे जगात कोठेही नसणारे हे बंधन कारणाशिवाय तसेच चालू आहे. या नोटिसीमुळे सरकार खटले टाळण्यासाठी काहीही करत नाही. मग खटल्यांची संख्या वाढली तर दोष कुणाचा?

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या