शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलणार?

By admin | Updated: January 12, 2016 01:59 IST

पनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सोमवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारी कार्यालयीन कामाकाजाच्या

मुंबई : उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सोमवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारी कार्यालयीन कामाकाजाच्या वेळा अर्धा तास पुढे-मागे होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली. महिलांच्या संरक्षणासंदर्भात आणि त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डब्बा आरक्षित ठेवण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला उपनगरी रेल्वेसेवेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांचा कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना केली होती. सोमवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाने केलेल्या सूचनेवर प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे शक्य आहे आणि सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती खंडपीठाला दिली. अर्धा तास वेळ पुढे- मागे करण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे आणि त्यांना यावर सूचना देण्यास सांगितले आहे, असे अ‍ॅड. काकडे यांनी सांगितले. महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि अन्य प्रवाशांसाठी स्वच्छ पाण्यासंदर्भात आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात काहीतरी करा, असे सांगत आहोत, मात्र आतापर्यंत आम्हाला काहीही करून दाखवण्यात आलेले नाही. केवळ चर्चा केली जाते पण कृती शून्य. प्रवाशांना केवळ स्वच्छ शौचालये आणि पाणी हवे आहे, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. (प्रतिनिधी)